शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

बळीराजा उघड्यावर...

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

शनिवारी रात्री आलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे

गहू जमीनदोस्त : भंडारा, मोहाडी, साकोलीत अतिवृष्टी, आंब्याचा मोहर झडला, शेकडो क्विंटल शेत पाण्यात भंडारा : शनिवारी रात्री आलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या पावसाने गव्हाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ओंंबीवरचा गहू या पावसामुळे अक्षरश: झोपला. भंडारा जिल्ह्यात सरासरी ६० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा, मोहाडी व साकोलीत अतिवृष्टी झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी होण्याचा कदाचित ही पहिलीच वेळ असावी. या पावसाने आंबा मोहर गळाला, हरभरा, तुरीच्या गंजा भिजल्या. अचानक पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागच्या संकटाची मालिका सुरूच असल्याने त्यांचे जनू कंबरडेच मोडले.खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्याला नागविले. त्यानंतर रब्बी पिकाची कशीबशी पेरणी केली. मात्र या हंगामातही दृष्टचक्राने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. रब्बी हंगामाचे पिक जोमात असताना ते हातात आल्यानंतर किमान नशिब पलटेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र त्या अपेक्षेवर अवकाळी पावसाने पाणी फेरले. रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेला व डौलात उभा असलेला गहू पूर्णत: जमीनीवर लोळला. कापणी झालेल्या हरभरा व तुरीच्या शेतात लावलेल्या गंजा अवकाळी पावसाने भिजल्या. आधिच जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास पळविला.याशिवाय बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडला आहे. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. अकाली पावसामुळे वातावरणात बदल झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. भंडारा जिल्ह्यात सरासरी ६६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात भंडारा येथे १०० मि.मी., मोहाडी ८० तर साकोली येथे ७२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस अतिवृष्टी असल्याने सर्वसामान्य नागरीकही यापासून वाचू शकला नाही. भंडारा जिल्ह्यात या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. अन्य तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कापणीला आलेले गहू या अतिवृष्टीच्या चक्रात अडकला आहे. यासोबतच चना व अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीचा फटका बसल्याने त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टीने महसूल प्रशासनाला सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांना जबर फटका बसला आहे. आधीच संकटात असलेल्या या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)