शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

बळीराजा उघड्यावर...

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

शनिवारी रात्री आलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे

गहू जमीनदोस्त : भंडारा, मोहाडी, साकोलीत अतिवृष्टी, आंब्याचा मोहर झडला, शेकडो क्विंटल शेत पाण्यात भंडारा : शनिवारी रात्री आलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या पावसाने गव्हाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ओंंबीवरचा गहू या पावसामुळे अक्षरश: झोपला. भंडारा जिल्ह्यात सरासरी ६० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. भंडारा, मोहाडी व साकोलीत अतिवृष्टी झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी होण्याचा कदाचित ही पहिलीच वेळ असावी. या पावसाने आंबा मोहर गळाला, हरभरा, तुरीच्या गंजा भिजल्या. अचानक पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागच्या संकटाची मालिका सुरूच असल्याने त्यांचे जनू कंबरडेच मोडले.खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्याला नागविले. त्यानंतर रब्बी पिकाची कशीबशी पेरणी केली. मात्र या हंगामातही दृष्टचक्राने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. रब्बी हंगामाचे पिक जोमात असताना ते हातात आल्यानंतर किमान नशिब पलटेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र त्या अपेक्षेवर अवकाळी पावसाने पाणी फेरले. रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेला व डौलात उभा असलेला गहू पूर्णत: जमीनीवर लोळला. कापणी झालेल्या हरभरा व तुरीच्या शेतात लावलेल्या गंजा अवकाळी पावसाने भिजल्या. आधिच जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास पळविला.याशिवाय बहरलेल्या आंब्याचा मोहर गळून पडला आहे. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी वर्तविली आहे. अकाली पावसामुळे वातावरणात बदल झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. भंडारा जिल्ह्यात सरासरी ६६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात भंडारा येथे १०० मि.मी., मोहाडी ८० तर साकोली येथे ७२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस अतिवृष्टी असल्याने सर्वसामान्य नागरीकही यापासून वाचू शकला नाही. भंडारा जिल्ह्यात या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. अन्य तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कापणीला आलेले गहू या अतिवृष्टीच्या चक्रात अडकला आहे. यासोबतच चना व अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीचा फटका बसल्याने त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टीने महसूल प्रशासनाला सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांना जबर फटका बसला आहे. आधीच संकटात असलेल्या या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)