शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसाय, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

By admin | Updated: July 16, 2016 00:36 IST

भंडारा जिल्ह्यात शेतीपुरक व्यवसायाला प्रचंड वाव असून शेतीपूरक व्यवसायासोबत कौशल्य विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण,....

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद भंडारा : भंडारा जिल्ह्यात शेतीपुरक व्यवसायाला प्रचंड वाव असून शेतीपूरक व्यवसायासोबत कौशल्य विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, जोडधंदे, जलयुक्त शिवार, माजी मालगुजारी तलावांची दुरूस्ती व खोलीकरण, भाजीपाला क्लस्टर आणि पर्यावरणपूरक पर्यटन या विषयांवर आपला भर राहणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात शुक्रवारला माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत चागले असून हा पावसाचे पाणी अडविल्यास त्याचा सिंचनासाठी वापर करणे सोयीचे होईल. मामा तलाव व जुन्या तलावांची संख्या मोठया प्रमाणात असून या तलावांचे सर्वेक्षण करुन नुतनीकरण व दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिल्यास त्याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे, असे सांगितले. दुबार पेरणीसाठीसुध्दा या तलावातील पाणी उपयोगी पडेल. यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाला प्राधान्य दिल्यास शेती सोबत पुरकव्यवसाय व शेती आधारित जोडधंदे या माध्यमातून नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकते. यादृष्टीने कौशल्यावर आधारित व्यवसाय व शेतीला चालना देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येईल. वैनगंगा नदी या जिल्ह्याला लाभली असून वैनगंगेचा किनारा असलेल्या गावांमध्ये भाजीपाला क्लस्टर निर्माण केल्यास गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मदत होईल. यासोबतच डेअरी फार्मिंग, गोटफार्मिंग व दुग्धव्यवसाय असा जोडधंद केल्यास शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल. येणाऱ्या काळात या दिशेने काम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येईल, असे सांगितले. जलयुक्त शिवारची कामे पूर्ण होतील तेव्हा जिल्ह्याच्या पाणी पातळीत निश्चित वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील मुलांमुलींना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी उपाय योजना आखल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. सोबतच शासनाच्या योजना प्राधान्याने राबवून विकासासाठी प्रयत्नशिल राहू, असेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)