विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:00 IST2025-11-25T10:57:03+5:302025-11-25T11:00:07+5:30

Vivah Panchami 2025: आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला प्रभू राम चंद्राचा जानकी मातेशी विवाह झाला, पण आजची तिथी सर्वसामान्य लोकांच्या विवाहासाठी अयोग्य का? ते पाहू. 

Vivah Panchami 2025: Ramsita got married on Vivah Panchami, but is this wedding date forbidden for others? | विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?

विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?

अयोध्या रामललाची जन्मभूमी. २२ जानेवारी २०२४ रोजी तिथे राममंदिर उभारण्यात आले आणि उर्वरित कामाची पूर्तता करून आज २५ नोव्हेंबर २०२५ रोजी कळसारोहण सोहळा पार पाडून मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यासाठी आज दुपारी १२-१२.३० या रामललाच्या जन्मवेळेचा मुहूर्तच ठरवण्यात आला आहे. त्याबरोबरच आजची तिथीही विशेष आहे. कारण आजच्याच दिवशी अर्थात मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यामुळे आजची तिथी विवाह पंचमी(Vivah Panchami 2025) म्हणून ओळखली जाते. याबद्दल अधिक जाणून घेऊ. 

Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ

विवाह पंचमीचे महत्त्व

१. प्रभू राम आणि माता सीतेचा विवाह : त्रेता युगात याच तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि माता सीता (जानकी) यांचा विवाह मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे.

उत्सव: यामुळे हा दिवस 'श्रीराम विवाहोत्सव' म्हणून साजरा केला जातो. विशेषतः अयोध्या (भारत) आणि जनकपूर (नेपाळ) मध्ये या दिवशी राम-सीता विवाह सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो.

२. दांपत्य जीवनासाठी शुभ

अखंड सौभाग्य: या दिवशी भगवान श्रीराम आणि माता सीतेची विधिवत पूजा, व्रत आणि विवाह सोहळा केल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. विवाहित जोडप्यांना सुख-शांती, प्रेम आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते.

लग्नातील अडथळे: ज्यांच्या विवाह प्रक्रियेत अडथळे येत आहेत किंवा विवाहामध्ये विलंब होत आहे, अशा अविवाहित व्यक्तींसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने चांगला जीवनसाथी मिळण्याची इच्छा पूर्ण होते.

Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!

३. रामचरितमानसची समाप्ती

तुलसीदासजी: गोस्वामी तुलसीदासजींनी आपल्या अमर ग्रंथ 'रामचरितमानस' ची रचना याच पवित्र तिथीला पूर्ण केली होती, असा देखील उल्लेख मिळतो. त्यामुळे या दिवशी रामचरितमानसचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते.

विवाह पंचमी पूजा विधी

>> सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

>> घरातील मंदिरात प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या विवाह स्वरूपाची प्रतिमा स्थापित करावी.

>> त्यांना अक्षत, फुले अर्पण करावी आणि वस्त्र (माता सीतेला लाल किंवा हिरवे आणि रामाला पिवळे) घालावे.

>> पूजेनंतर 'सीताराम' नाम जप करावा किंवा रामचरितमानसचा विवाह प्रसंग वाचावा.

>> आरती करून प्रसाद वाटून घ्यावा.

दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 

सर्वसामान्यांसाठी 'ही' विवाह तिथी निषिद्ध : 

धार्मिक मान्यतेनुसार, विवाह पंचमीचा दिवस अत्यंत पवित्र असला तरी, अनेक ठिकाणी या दिवशी मानवांचे लग्न केले जात नाही. यामागील कारण असे दिले जाते की, विवाहानंतर माता सीता आणि प्रभू राम यांना वनवास आणि विरहासारख्या अनेक कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे या दिवशी लग्न केल्यास दांपत्य जीवनात अडचणी येऊ शकतात, अशी मिथिलांचल (नेपाळ) मध्ये एक लोकमान्यता आहे.

Web Title : विवाह पंचमी २०२५: महत्व, रीति-रिवाज और क्यों विवाह के लिए वर्जित है।

Web Summary : विवाह पंचमी राम और सीता के विवाह का उत्सव है। यह पूजा और वैवाहिक बाधाओं को दूर करने के लिए शुभ है, लेकिन कई लोग इसे मानवीय विवाहों के लिए टालते हैं क्योंकि दिव्य युगल को कठिनाइयों का सामना करना पड़ा था। रामचरितमानस को पूर्ण करने के लिए यह महत्वपूर्ण है।

Web Title : Vivah Panchami 2025: Significance, rituals, and why it's avoided for marriages.

Web Summary : Vivah Panchami celebrates the divine marriage of Ram and Sita. While auspicious for worship and removing marital obstacles, many avoid it for human weddings due to the hardships faced by the divine couple. It's significant for completing Ramcharitmanas.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.