शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही; वाचा, व्यापारी आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

By देवेश फडके | Updated: January 14, 2021 18:51 IST

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा...

ठळक मुद्देशिर्डीच्या साईबाबांची अज्ञात पण प्रेरणादायी कथासाईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाहीत, असा अनेकांचा अनुभवव्यापाऱ्याचा आजारी मुलगा आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

शिर्डीचेसाईबाबा हे कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहेत. जगभरात साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. साईबाबांच्या दरबारात सर्वांना येण्याची परवानगी दिली जाते. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, जातीची, पंथाची असो. साईबाबांनी आपल्या अनेक कृतीतून समाजाला उत्तमोत्तम उपदेश, शिकवण, बोध दिले आहेत. साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा...

एका व्यापाऱ्याचा मुलगा खूप आजारी होता. किती काही केल्या त्याच्या आजाराचे निदान होत नव्हते. अनेक वैद्य करून झाले. मात्र, तरीही गुण येत नव्हता. व्यापारी साईबाबांचा मोठा भक्त होता. त्या मुलाला त्याने साईबाबांकडे नेण्याचे निश्चित केले. मुलाला घेऊन त्याने लगेचच शिर्डी गाठली. साईबाबांचरणी नतमस्तक होऊन मुलाच्या आजाराबाबत माहिती दिली. 

साईबाबांनी स्मितहास्य केले आणि मुलाला आशिर्वाद दिला. दिवस मावळला, तसे मुलाला बरे वाटू लागले. साईबाबांमुळे मुलगा बरा झाल्याचे त्याने गावभर सांगितले. मात्र, त्याला थांबवत साईबाबा म्हणाले की, सबका मालिक एक. केवळ परमेश्वरच एखाद्याला जीवन देऊ शकतो. यात माझे काही सामर्थ्य नाही. 

काही दिवस व्यापारी शिर्डीत राहिला. मुलाच्या आरोग्यात फरक पडलेला पाहून तो मुंबईला परतला. मुंबईत परतण्यापूर्वी त्या दोघांनी साईबाबांची भेट घेतली. तेव्हा साईबाबांनी त्याला तीन रुपये दिले आणि म्हणाले की, दोन रुपये मी तुला आधीच दिले आहेत. आता हे तीन रुपये घे आणि ते पूजास्थानी ठेव. देवाचे नामस्मरण कर. नेहमी चांगले कर्म कर. तुझे भले होईल, असा आशिर्वाद साईबाबांनी दिला. 

साईबाबांनी मला यापूर्वी कधी दोन रुपये दिले, हे त्या व्यापाऱ्याला काही केल्या आठवेना. या विचारातच त्याने मुंबई गाठली. घरी येऊन घडलेला सर्व प्रकार त्याने आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने एक जुनी आठवण त्याला सांगितली. आई म्हणाली की, बाळा, तू लहान असताना बराच आजारी होतास. तेव्हा तुझे वडील तुला साईबाबांकडे घेऊन गेले होते. त्यावेळेस साईबाबांनी तुला आशिर्वाद म्हणून दोन रुपये दिले होते. साईबाबा आपल्या भक्तांच्या मनाशी कायम जोडलेले असतात. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते, असे आई म्हणाली. आईने सांगितलेली हकीकत ऐकून त्या व्यापारी आनंद झाला. भक्त आणि देवाचे नाते खूप मजबूत असते. भक्त जरी देवाला विसरला, तरी देव मात्र, त्यांना कधीच विसरत नाहीत. देव नेहमीच कठीण परिस्थितीत भक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, यावरील त्याचा विश्वास आणखी दृढ झाला.

टॅग्स :saibabaसाईबाबाshirdiशिर्डी