शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

'त्या' एका चित्राने राजाचे आयुष्य बदलले, कदाचित तुमचेही बदलेल; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:01 IST

तुम्ही मनःशांतीच्या शोधात आहात? मग ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे!

'दूर कुठे तरी निघून जावे' असे आपल्या प्रत्येकाला वरचेवर वाटत असते. अशी जागा, जिथे खूप शांतता असेल, कुठलाही त्रास नसेल, कोणाशीही स्पर्धा नसेल, कोणी आपल्याला दुखावणारे नसेल, आयुष्याचा भरभरून आनंद घेता येईल. मात्र, दुदैवाने अशी जागा मनुष्याने शिल्लकच ठेवलेली नाही. पृथ्वी कमी पडते म्हणून की काय, तो चंद्रारवर, मंगळावर जागा विकत घेऊ लागला आहे. परंतु, तिथे तरी अपेक्षित असलेला एकांत गवसणार आहे का? मग तो कुठे मिळेल? जगभरात अशी एकही जागा नाही का, जिथे मन:शांती मिळेल? याबाबत गुरु गौर गोपाल दास आश्वस्थ करतात, अशी एक जागा आहे. कोणती, ती या कथेत सापडेल.

एक राजा होता. तो अजातशत्रू होता. शत्रू त्याला पाहून थरथर कापत असत. त्याच्या रयतेवर अनिष्ट आणण्याचे धाडस कोणात्याही सम्राटात नव्हते. सगळी आलबेल होती. सुबत्ता होती. राजाच्या पायाशीदेखील सगळी सुखं लोळण घेत होती. संसारसुखाचीही कमतरता नव्हती. असे सगळे असूनही, राजाचे मन मन:शांतीसाठी व्याकूळ असे. ती कुठे गवसेल, या शोधात तो होता. त्याने एक स्पर्धा आयोजित केली आणि 'मन:शांती' हा विषय चित्रातून अभिव्यक्त करण्याचे आवाहन केले. विजेत्याला भरघोस संपत्तीने  भरलेली धनाची पेटी बक्षिस म्हणून देण्याचेही घोषित केले. देशोदेशिच्या चित्रकारांनी स्पर्धेत भाग घेतला. राजाने जातीने लक्ष घालून सर्व चित्रांची तपासणी केली. या विषयातील तज्ञांचीदेखील मते घेतली. सरतेशेवटी दोन चित्रांची निवड झाली. 

पहिले चित्र, अतिशय सुंदर होते. नावे ठेवायला जागाच नाही. शांतता हा भाव चित्रातील प्रत्येक बारकाव्यातून उमटत होता. सुंदर निसर्ग, उंच पर्वत, कोवळे ऊन, झुळझुळू वाहणारी नदी, नदीच्या काठावर हिरवळ, खुल्या आकाशाखाली पंख पसरवून विहार करणारे मोर, नाजूक सुकोमल फुलांतून गंध प्राशन करणारे मधुकर आणि त्या निसर्गाचा आस्वाद घेत बासरीवादनात दंग झालेले श्रीकृष्ण. संगीत ऐकताना देहभान विसरून गेलेल्या गायी, श्वान, पशू-पक्षी. ते चित्र पाहता, राजाचे भान हरखून गेले. मनोमन त्याने चित्रकाराला बक्षिस जाहीरही करून टाकले. परंतु, दुसरे चित्र पाहिल्यानंतरच नाम घोषित करता येणार होते. म्हणून राजाने दुसऱ्या चित्राकडे मोर्चा वळवला. 

दुसरे चित्र पाहत असताना क्षणभरापुर्वीची शांतता क्षणात भंग पावली. मन उद्विग्न झाले. हे चित्र विषयाला अनुसरून नाही, असे म्हणत तो, त्या चित्राच्या निवडीबद्दल तज्ञांना जाब विचारणार, तोच क्षणभर थांबला. त्याने चित्र निरखून पाहिले. रखरखीत डोंगराळ परिसर, निष्पर्ण झाडं, उजाड वस्ती, कुपोषित जनता, घोंगावणारे वादळ, काही क्षणात धुंवाधार पावसाची शक्यता, पावसाच्या पाण्यात वाहून जातील, अशी मोडकळीस आलेली घरे, हे पाहताना राजा कमालीचा अस्वस्थ झाला. त्याचवेळेस त्याचे लक्ष तुटक्या झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या वृद्ध माणसाकडे गेले. त्या वादळी प्रसंगातही त्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती. संकट थैमान घालत असतानाही, तो स्थितप्रज्ञ होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची, काळजीची पुसटशी रेषाही नव्हती. त्याला पाहिल्यावर राजाचे व्याकूळ झालेले मन एकाएक शांत झाले. ही शांतता क्षणिक नव्हती. चिरकाल टिकणारी होती. कारण, चित्रातल्या वृद्ध माणसाने आपल्या चेहऱ्यावरील भावांनी शांततेची खरी व्याख्या राजाला न बोलता समजावून सांगितली होती. ती व्याख्या म्हणजे, 

'शांतता बाहेर शोधू नका, ती तुमच्या आत आहे. शांत जागा तुम्हाला सापडेलही, परंतु मन शांत नसेल, तर त्या शांत वातावरणातही तुमच्या मनात कोलाहल सुरू राहिल. मग तुम्ही कितीही विकेंड पिकनिक काढा, मन:शांती लाभणार नाही. बाहेरच्या प्रवासाऐवजी आतला प्रवास करा. शांततेला शोधण्याचा प्रयत्न करा. ती सापडली, अवगत झाली, तर कोणीही बाह्य व्यक्ती, परिस्थिती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. जगातील सर्वात शांत जागा बाहेर नाही, तर तुमच्या मनात आहे. ती शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतःशी बोलू नका. डोळे मिटून स्वतःकडे शांतपणे पहा. स्वतःचे आकलन करा. मी कोण आहे, मला काय आवडते, मी का जगतोय, माझे ध्येय काय, माझं स्वतःवर आणि इतरांवर किती प्रेम आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मन आपोआप शांत होईल. समाजासमोर मिरवणारा खोटा मुखवटा गळून पडेल आणि स्वतःशी नव्याने ओळख होईल. ती ओळखच तुम्हाला मनातला शांत कोपरा दाखवेल. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य