शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:22 IST

Narak Chaturdashi 2025 Abhyanga Snan: यंदा सोमवारी २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे, दिवाळीची पहिली अंघोळ आणि कारीट फोडण्याचा विधी या दिवशी का करतात ते पाहू. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीची(Diwali 2025) दणक्यात सुरुवात झाली आहे. पावसाने वेळेतच माघार घेतल्याने लोकांच्या उत्साहावर पाणी फिरले नाही. १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने दीपोत्सव सुरु झाला असून, १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, २० ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन(Laxmi Pujan 2025), २२ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा, २३ ऑक्टोबरला भाऊबीज(Bhai Dooj 2025) असा भरगच्च आठवडा असणार आहे. 

Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?

अशातच नरक चतुर्दशीच्या सणाला पहिल्या अंघोळीचा मान मिळाला आहे. या दिवशी अभ्यंग स्नान व कारीट फोडणे या दोन प्रमुख पारंपरिक गोष्टी भल्या पहाटे केल्या जातात. त्यामागे नेमके कारण काय? ते जाणून घेऊ. 

दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी(Narak Chaturdashi 2025). या दिवसाला 'छोटी दिवाळी' असेही म्हणतात. नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे एक प्रमुख पौराणिक कथा आहे आणि याच कथेमुळे या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारीट फोडणे या दोन खास परंपरा पाळल्या जातात.

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा:

प्राचीन काळात नरकासुर नावाच्या एका अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाने आपल्या शक्तीच्या जोरावर देवांना, ऋषींना, सर्वसामान्य लोकांना खूप त्रास दिला. त्याने १६,००० राजकन्यांना बंदी बनवून ठेवले होते आणि अनेक स्त्रियांचा छळ केला. त्याच्या या अत्याचाराला कंटाळून लोकांनी भगवान श्रीकृष्णाला मदतीची याचना केली.

भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराशी युद्ध केले. याच दिवशी, म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला, श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या तावडीतून मुक्त केले. नरकासुराच्या वधानंतर, लोकांनी अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद म्हणून हा दिवस उत्सवासारखा साजरा केला, जो पुढे नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला.

अभ्यंग स्नानाचे महत्त्व (पापांचा नाश) : 

नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते. हे डाग धुऊन शरीर शुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाला सुंगधी तेल, उटणे लावून जे स्नान घातले, त्यावरूनच अभ्यंग स्नानाची प्रथा सुरू झाली. हे स्नान पहाटे सूर्योदयापूर्वीच करायचे असते.  मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पाप धुतले जाते. या दिवशी स्नान केल्यास नरक यातनांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते.

Happy Diwali 2025 Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!

कसे करावे यमतर्पण?

तांब्याच्या कलशात पाणी, काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला ते पाणी यमाला अर्पण करत पुढील मंत्र म्हणा. 

ॐ यमाय नमः। ॐ धर्मराजाय नमः। ॐ मृत्यवे नमः। ॐ अन्ताकाय नमः। ॐ वैवस्वताय नमः। ॐ कालाय नमः। ॐ सर्वभूतक्षयाय नमः। ॐ औदुम्बराय नमः। ॐ दध्राय नमः। ॐ नीलाय नमः। ॐ परमेष्ठिने नमः। ॐ वृकोदराय नमः। ॐ चित्राय नमः। ॐ चित्रगुप्ताय नमः।

अर्पण केलेले पाणी घरात न सांडू देता, ते पिंपळाच्या झाडाला किंवा अन्य कोणत्याही झाडाला अर्पण करावे.

कारीट फोडण्याची प्रथा 

अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचे एक फळ (जे कडवट असते) ते पायाने फोडण्याची प्रथा आहे. ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण, कारीट हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, याचे प्रतीक म्हणून नरक चतुदर्शीला पहाटे पाय ठेवून कारीट फोडले जाते. कारीट फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानला जातो. हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते. कारीट फोडल्यानंतर येणारा कडवट वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते. यानंतर सुगंधी अभ्यंगस्नान करून शुद्ध आणि सात्विक जीवनाची सुरुवात केली जाते.

थोडक्यात, नरक चतुर्दशी ही केवळ दिवाळीची तयारी नाही, तर ती अत्याचारावर धर्माचा विजय आणि पापावर पुण्याने मिळवलेला विजय दर्शवते. या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारीट फोडण्याची प्रथा पाळून, प्रत्येकजण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यास बळ देते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Narak Chaturdashi 2025: Significance of Abhyang Snan and Karit Breaking

Web Summary : Narak Chaturdashi celebrates Lord Krishna's victory over Narakasura. The traditions of Abhyang Snan (ritualistic bath) signifies purification, while breaking 'karit' symbolizes destroying evil. These customs herald a fresh, virtuous beginning, triumphing over negativity.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीLord Krishnaभगवान श्रीकृष्णPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण