Lord Buddha: तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही? भगवान बुद्धांचे 'हे' ९ नियम तुमच्यासाठीच आहेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:31 IST2026-02-19T16:29:50+5:302026-02-19T16:31:16+5:30
Lord Buddha: मन ताब्यात ठेवणं हे वाऱ्याला मुठीत ठेवण्याएवढे कठीण आहे, या सैरभैर मनाला लगाम घालण्यासाठी भगवान बौद्धांनी सांगितलेले ९ नियम जाणून घेऊ.

Lord Buddha: तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही? भगवान बुद्धांचे 'हे' ९ नियम तुमच्यासाठीच आहेत!
अनेकदा आपले मन आपल्याला हवे तसे वागायला लावते, पण सुखी जीवनासाठी आपण मनाचे मालक होणे गरजेचे आहे. भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित या ९ कृती तुम्हाला स्वतःवर विजय मिळवण्यास मदत करतील:
१. विचारांचे निरीक्षण करा (Observe your thoughts)
तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मन अनेकदा नकारात्मक किंवा काल्पनिक विचार निर्माण करते, फक्त एक तटस्थ किंवा त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्याकडे पाहायला शिका.
२. प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया नको (Respond, never react)
कोणत्याही घटनेवर लगेच चिडून किंवा रागावून प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ थांबून, शांत डोक्याने परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद देणे, हे सुजाण मनाचे लक्षण आहे.
Astro Tip: अनामिक भीती वाटतेय? टेन्शन आलंय? 'हा' चमत्कारिक मंत्र देईल इन्स्टंट रिझल्ट!
३. रोज मौन पाळा (Practice silence every day)
दिवसभरातील काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा आणि शांत बसा. मौनामुळे मनातील कोलाहल कमी होतो आणि अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो.
४. निकालाची अपेक्षा सोडून द्या (Learn to detach from outcomes)
केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करा आणि निकालाची चिंता सोडा. जेव्हा आपण फळाची अपेक्षा कमी करतो, तेव्हा भीती आणि ताण आपोआप कमी होतो.
५. मूडला तुमची कृती ठरवू देऊ नका (Don't let mood decide your actions)
तुमचे मन किंवा 'मूड' आज काम करायला सांगत नसेल, तरीही तुमच्या कर्तव्याला प्राधान्य द्या. तुमच्या भावना तुमच्या ध्येयाच्या आड येऊ देऊ नका.
६. मनाला स्नायूंसारखे प्रशिक्षित करा (Train your mind like a muscle)
जसे शरीर घडवण्यासाठी व्यायामाची गरज असते, तसेच मनाला एकाग्र करण्यासाठी दररोज सरावाची (ध्यानाची) गरज असते. सरावाने मन अधिक बळकट होते.
७. तक्रारींऐवजी कृतज्ञता व्यक्त करा (Replace complaints with gratitude)
आयुष्यात काय नाही, याबद्दल रडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञतेची भावना तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि समाधान घेऊन येते.
८. वाचन वाढवा (Read more)
मोबाईलवर विनाकारण 'स्क्रोलिंग' केल्याने मन विचलित आणि अस्थिर होते. त्याऐवजी दर्जेदार पुस्तकांचे वाचन करा, ज्यामुळे तुमच्या विचारांची कक्षा रुंदावेल.
स्वामी समर्थ तारक मंत्र: संकल्पाची 'ही' पद्धत बदलू शकते तुमचे संपूर्ण आयुष्य; गुरुवारी करा सुरुवात!
९. तुमचे लक्ष नियंत्रित करा (Control your attention = control your life)
तुमचे लक्ष जिथे असते, तिथेच तुमची ऊर्जा खर्च होते. जर तुम्ही तुमच्या लक्षावर ताबा मिळवला, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनावर ताबा मिळवू शकता.