शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

नवस करणे कितपत बरोबर आहे? याबाबतीत धर्मशास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:20 IST

देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही.

अलीकडच्या काळातील नवस करण्याची प्रथा इतकी घातक आणि विकृत झाली आहे, की त्यातून फक्त श्रद्धानाश हेच फळ मिळू शकेल. अशा वेळी प्रश्न उद्भवतो, की नवस करणे खरोखरच योग्य आहे का? तो फळतो का? यामागे शास्त्रविचार काय आहे, ते 'शास्त्र काय सांगते' या पुस्तकाच्या आधारे समजून घेऊ.

साधना, उपासना व धर्माचरण या दोन गोष्टी शुद्ध भक्तीने व प्रांजळ मनाने केल्यास त्याचे अलौकिक फळ मिळते. पण जेव्हा वास्तव श्रद्धेचा अभाव, धर्मशास्त्राविषयी अज्ञान व अंधपरंपरेचे भूत मानेवर असते तेव्हा त्यातून 'नवसा'सारख्या गोष्टीचा उगम होतो. ज्यावेळी ईश्वराचे मानवीकरण होते तेव्हा त्याच्या नवविधा भक्तीबरोबर अन्यही मानवी विकार दृढ होतात. भक्तासाठी देव मानवाप्रमाणे रूप धारण करून त्याच्याकडून नवविधा भक्ती करून घेतो. पण मानवाला वाटते की, आता देव आनायासे मानवाप्रमाणे वागतोच आहे तेव्हा त्याला थोडेबहुत अमिष देऊन आपले काम करून घेण्यास काय हरकत आहे?

वास्तविक या विश्वात ईश्वराचे साम्राज्य आहे. जेव्हा एखाद्या उद्दिष्टाप्रती चिकाटीने झटणे, त्यासाठी अंगी सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून व अपयश आल्यास त्याची व्यथा सौम्य व्हावी म्हणून ईश्वराची करुणा भाकणे एवढेच मानवाच्या हातात आहे. ते उद्दिष्ट सफल झालेच पाहिजे असा हट्ट मानवाला धरता येणार नाही. कारण त्यासाठी मानवाची कर्मगती कारणीभूत असते. त्यामुळे एखादे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून देवाला नवस बोलणे योग्य नाही.

 

जो त्रिभुवनाचा स्वामी आहे, त्याला मूठभर पेढे, चांदीचा किरीट इ. पदार्थांची आवश्यकता काय? पण भक्ताने प्रेमाने दिलेले शिळे फुलही तो स्वीकारतो. कारण तो प्रेममय असल्याने त्याला प्रेमाची भूक असते. 

नवस करताना बहुतेक वेळा प्रेमाचा अभाव असतो. देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही. पण प्रीतीपोटी भक्ती करता भीतीपोटी भक्ती करणारे भक्त एखाद्या उद्दीष्टासाठी एकाच वेळी एकाच नव्हे तर दहा देवांना नवस करतात. चुकून कार्य झालेच तर ते नवस फेडले जातील असेही नाही. कारण काम झाल्यावर नवसाची आठवण राहत नाही. अर्थात आठवण राहिली काय किंवा न राहिली काय, देवाला क्षुद्र वस्तूंची काहीच जरूरी नसते. पण त्याचा भक्तिभाव वाढवण्यासाठी देव झटत असतो.

याचा अर्थ नवसशास्त्र पूर्ण खोटे किंवा निराधार आहे असेही नाही. पण नवस करताना मर्यादांची जाणीव ठेवावी लागते. नवस करताना एकाच दैवताला केला व त्या दैवताविषयी पुरेपूर भक्तिभाव मनात असला तर त्या नवसाला काही अर्थ असतो. 

जी कार्ये सहजगत्या होऊ शकतील, ज्यांच्यासाठी निसर्गाचे नियम बदलावे लागणार नाहीत अशा कार्यासाठी नवस केल्यास व तोही अगदी मनापासून केल्यास ती कामना कळत नकळत अंतर्मनात शिरते व ती वैश्विक मनात प्रविष्ट होते. 

जसे की वर्षारंभी एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होण्याचा नवस केल्यास तो नवस त्याला भरपूर अभ्यासाला प्रवृत्त करेल. मनोबल देईल, उत्साह वाढवेल. त्यामुळे नवस आपोआप पूर्ण होईल. पण उनाड मुलाच्या आईने माझा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे असा नवस केला तर खुद्द ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही. 

यास्तव मानवी सामर्थ्याच्या मर्यादा, तारतम्य, सभोवतालचे वातावरण लक्षात घेऊन मन:पूर्वक भक्तीने एखादा नवस केल्यास तो सफल होऊ शकेल.