शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवस करणे कितपत बरोबर आहे? याबाबतीत धर्मशास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:20 IST

देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही.

अलीकडच्या काळातील नवस करण्याची प्रथा इतकी घातक आणि विकृत झाली आहे, की त्यातून फक्त श्रद्धानाश हेच फळ मिळू शकेल. अशा वेळी प्रश्न उद्भवतो, की नवस करणे खरोखरच योग्य आहे का? तो फळतो का? यामागे शास्त्रविचार काय आहे, ते 'शास्त्र काय सांगते' या पुस्तकाच्या आधारे समजून घेऊ.

साधना, उपासना व धर्माचरण या दोन गोष्टी शुद्ध भक्तीने व प्रांजळ मनाने केल्यास त्याचे अलौकिक फळ मिळते. पण जेव्हा वास्तव श्रद्धेचा अभाव, धर्मशास्त्राविषयी अज्ञान व अंधपरंपरेचे भूत मानेवर असते तेव्हा त्यातून 'नवसा'सारख्या गोष्टीचा उगम होतो. ज्यावेळी ईश्वराचे मानवीकरण होते तेव्हा त्याच्या नवविधा भक्तीबरोबर अन्यही मानवी विकार दृढ होतात. भक्तासाठी देव मानवाप्रमाणे रूप धारण करून त्याच्याकडून नवविधा भक्ती करून घेतो. पण मानवाला वाटते की, आता देव आनायासे मानवाप्रमाणे वागतोच आहे तेव्हा त्याला थोडेबहुत अमिष देऊन आपले काम करून घेण्यास काय हरकत आहे?

वास्तविक या विश्वात ईश्वराचे साम्राज्य आहे. जेव्हा एखाद्या उद्दिष्टाप्रती चिकाटीने झटणे, त्यासाठी अंगी सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून व अपयश आल्यास त्याची व्यथा सौम्य व्हावी म्हणून ईश्वराची करुणा भाकणे एवढेच मानवाच्या हातात आहे. ते उद्दिष्ट सफल झालेच पाहिजे असा हट्ट मानवाला धरता येणार नाही. कारण त्यासाठी मानवाची कर्मगती कारणीभूत असते. त्यामुळे एखादे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून देवाला नवस बोलणे योग्य नाही.

 

जो त्रिभुवनाचा स्वामी आहे, त्याला मूठभर पेढे, चांदीचा किरीट इ. पदार्थांची आवश्यकता काय? पण भक्ताने प्रेमाने दिलेले शिळे फुलही तो स्वीकारतो. कारण तो प्रेममय असल्याने त्याला प्रेमाची भूक असते. 

नवस करताना बहुतेक वेळा प्रेमाचा अभाव असतो. देवाविषयी प्रेम असणारा भक्त कधीच नवस करत नाही. पण प्रीतीपोटी भक्ती करता भीतीपोटी भक्ती करणारे भक्त एखाद्या उद्दीष्टासाठी एकाच वेळी एकाच नव्हे तर दहा देवांना नवस करतात. चुकून कार्य झालेच तर ते नवस फेडले जातील असेही नाही. कारण काम झाल्यावर नवसाची आठवण राहत नाही. अर्थात आठवण राहिली काय किंवा न राहिली काय, देवाला क्षुद्र वस्तूंची काहीच जरूरी नसते. पण त्याचा भक्तिभाव वाढवण्यासाठी देव झटत असतो.

याचा अर्थ नवसशास्त्र पूर्ण खोटे किंवा निराधार आहे असेही नाही. पण नवस करताना मर्यादांची जाणीव ठेवावी लागते. नवस करताना एकाच दैवताला केला व त्या दैवताविषयी पुरेपूर भक्तिभाव मनात असला तर त्या नवसाला काही अर्थ असतो. 

जी कार्ये सहजगत्या होऊ शकतील, ज्यांच्यासाठी निसर्गाचे नियम बदलावे लागणार नाहीत अशा कार्यासाठी नवस केल्यास व तोही अगदी मनापासून केल्यास ती कामना कळत नकळत अंतर्मनात शिरते व ती वैश्विक मनात प्रविष्ट होते. 

जसे की वर्षारंभी एखाद्या विद्यार्थ्याने विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होण्याचा नवस केल्यास तो नवस त्याला भरपूर अभ्यासाला प्रवृत्त करेल. मनोबल देईल, उत्साह वाढवेल. त्यामुळे नवस आपोआप पूर्ण होईल. पण उनाड मुलाच्या आईने माझा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे असा नवस केला तर खुद्द ब्रह्मदेवही काही करू शकणार नाही. 

यास्तव मानवी सामर्थ्याच्या मर्यादा, तारतम्य, सभोवतालचे वातावरण लक्षात घेऊन मन:पूर्वक भक्तीने एखादा नवस केल्यास तो सफल होऊ शकेल.