शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला आहात?; हा भारच करेल यशावर स्वार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 16:18 IST

लोकांच्या अपेक्षांचं ओझं तुम्हाला दाबून टाकतं आहे का? मग त्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा. त्यातही तुम्हाला प्रगतीची संधी सापडेल.

जर लोकांच्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षांचा त्रास होत असेल, तर कदाचित त्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची वेळ आली आहे. सद्गुरू आपल्याला सांगतात, अपेक्षा या आपल्याला सध्याच्या क्षमतांच्या पलीकडे जाण्याची आणि जीवनात काहीतरी करण्याची संधी देऊ शकतात.

सद्गुरू: वेगवेगळ्या लोकांच्या तुमच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षा परस्पर विरोधीही असतात. तुमच्या पत्नीची इच्छा असते की तुम्ही ५:३० पर्यंत घरी यावं, पण तुमच्या बॉसची इच्छा असते की तुम्ही ७:३० पर्यंत ऑफिसमध्ये थांबावं. तुमच्याजवळ फक्त चोवीस तासच आहेत, पण तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तुमच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तुमच्या बॉसच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, आणि त्यावर पुन्हा पतीच्या किंवा पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत; एवढं करायला खरंतर तुम्हाला साठ तासांचा दिवस लागेल. "बाकीचे जास्तीचे तास मला कुठून मिळतील?" हाच मुळात प्रश्न आहे.

सध्या, लोकांच्या तुमच्याकडून असणाऱ्या अपेक्षा या तुमच्या क्षमतांच्या कितीतरी पलीकडच्या आहेत. याला एक शाप ठरवू नका. उलट, ते एक मोठं वरदान आहे की लोकं तुमच्याकडून इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवत आहेत. जर लोकांनी तुमच्याकडे बघितलं आणि विचार केला, "अरे! आपण ह्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू शकत नाहीत", आणि त्यांना तुमच्याकडून काहीही अपेक्षा केल्या नाहीत, तर तुम्हाला वाटतं हे काही तुमच्यासाठी चांगलं लक्षण असेल? जर तुमच्या बॉसला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नसतील तर तो तुम्हाला कामावरून काढून टाकेल. ते सगळे तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवून आहेत. तुमच्या मर्यादांपलिकडे जाऊन आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची ही एक संधी आहे. याचा अर्थ असा होतो का की इतरांच्या अपेक्षापूर्तीसाठी तुम्ही काहीतरी सर्वोत्तम गोष्ट कराल? असं कधीही घडणार नाही. पण ते सगळे सदैव तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू लागले, याचा अर्थ तुमचं आयुष्य सुरळीत चालू आहे. हा एक शुभसंकेत आहे. त्याबद्द्दल तुम्ही खुश असलं पाहिजे, त्याबद्दल तक्रार करू नका. तुमच्याकडून जे सर्वोत्तम होऊ शकेल ते करा आणि बस्स, एवढंच आहे.

हे काही तुमचे कार्य निर्दोष करण्याबद्दल नाहीये. आयुष्यात 'परफेक्ट' असं काही नसतंच. एकच गोष्ट आयुष्यात एकदम अचूक होते, ती म्हणजे मृत्यू. जर तुम्ही आयुष्यात अजाणतेपणे अचूकतेच्या मागे लागलात तर तुम्ही मृत्यूकडे वाटचाल कराल. त्यामुळे आयुष्यात अचूकतेच्या मागे लागू नका. तुम्ही अचूक असाल म्हणून काही तुमचं आयुष्य सुंदर होत नाही, तर तुम्ही आयुष्यात जे जे काही करता त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्यानं आयुष्य सुंदर बनतं. जीवन कधीही अचूक असू शकत नाही कारण ज्या कोणत्या प्रकारे तुम्ही आत्ता या क्षणी कार्यरत आहात, त्यापेक्षा तुम्ही थोडेसे अधिक असू शकता, नाही का? त्यामुळे अचूकतेचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा अपेक्षा भव्य-दिव्य असतील तेव्हाच तुम्ही बंधनं झुगारून स्वतःला ताणू शकाल. जर तुम्ही अजून ताणू शकत असाल, याचा अर्थ तुम्ही अजूनही तुमच्या अंतिम मर्यादांपर्यंत पोहोचलेला नाही आहात. जर काहीच अपेक्षा नसतील, तुम्ही कधीच स्वतःच्या पूर्ण क्षमतांचा शोध घेऊ शकणार नाही.

कोणाच्याही अपेक्षेविना स्वतःला स्वतःच्या अंतिम रेषेपर्यंत ताणण्यासाठी अत्यंत वेगळ्या पातळीची चेतना आणि जागरूकता लागते. यासाठी काहीतरी सर्वस्वी वेगळं लागतं. आत्ता सध्या तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही फक्त लोकांच्या अपेक्षेप्रमाणे चालणारे आहात. तर असू द्या लोकांच्या तुमच्याकडून मोठ-मोठ्या अपेक्षा. तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे परिस्थिती सांभाळा. काही गोष्टी नियंत्रणाच्या पलिकडे असतील, आणि जितक्या जास्त गोष्टी करू लागाल, तितक्या जास्त गोष्टी आयुष्यात चुकत जातील. पण बऱ्याच गोष्टी सुरळीत मार्गावर लागतील. तुमच्या आयुष्याची गुणवत्ता, किंवा तुमच्या आयुष्याचं यश हे काहीतरी पूर्ण करण्याच्या मापनावर अवलंबून असण्याची गरज नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीप्रती स्वतःला संपूर्ण समर्पित करू शकता की नाही यावर त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. तुमच्या क्षमतांप्रमाणे जे घडायचं आहे ते घडेल. आणि सगळं काही जुळून येण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. पण आयुष्यात तुम्ही जे काही करताय त्याला तुम्ही शंभर टक्के समर्पित आहात का? हा खरा प्रश्न आहे.