शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा फटका, रब्बी पिकांसह आंबा, डाळिंब बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

आष्टी : तालुक्यात शनिवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन ...

आष्टी : तालुक्यात शनिवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेल्या डाळिंब, आंबा, द्राक्ष फळबागा वादळी वाऱ्याने अक्षरशः आडव्या झाल्या तर लगडलेल्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला. या बागांबरोबरच कांदा, गहू, मका या काढणी सुरु असलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.

तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, आंबा, डाळिंब, द्राक्षांच्या बागांमध्ये काढणीला आलेल्या फळांचा झाडाखाली खच पडला आहे. तालुक्यात कलमी आंब्याच्या, चिकूच्या बागा आहेत. द्राक्ष हंगामही अंतिम टप्प्यात आहे. या बागांना अवकाळीचा फटका बसला आहे. गहू, कांदा, हरभरा या पिकांची शेतकऱ्यांची काढणी सुरु असून, कोरोनाचे संकट असतानाच स्वच्छ असणाऱ्या आकाशात रात्रीपासून अचानक ढग दाटून आले व रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या आसपास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पीक होत्याचे नव्हते झाले. कऱ्हेवडगाव येथील राम नागरगोजे यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील छत वादळी वाऱ्याने उडून गेले. सुदैवाने अन्य कोणतीही हानी झाली नाही. आंधळेवाडी येथील कैलास आंधळे यांची ५ एकरवरील केशर आंब्याची ५०० झाडांची बाग व १२ एकरवरील डाळिंबाची ४,५०० झाडे, १ एकरवरील दोडका तसेच २२ लाखांच्या पाॅलिहाऊसचे नुकसान झाले आहे. याच परिसरातील राजेश रघुनाथ कराड, भाऊसाहेब मारुती आंधळे, रावसाहेब मारुती आंधळे, बाबासाहेब मारुती आंधळे, द्वारकाबाई मारुती आंधळे, मारुती वनाजी आंधळे यांच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे.

२५ लाखांपेक्षा जास्त नुकसान

माझ्या शेतातील ५ एकरावरील आंब्यांच्या झाडाचे ४ टन आंबे खाली पडले आहेत, यात ४ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे तर डाळिंबाचे ५ लाखांपेक्षा जास्त, १ एकर क्षेत्रावरील दोडक्याचे ५ ते ६ लाखांचे तर १ एकरवरील २२ लाख रुपयांच्या नवीन केलेल्या पाॅलिहाऊसमध्ये लावलेल्या लाल, पिवळ्या मिरचीचे नुकसान झाले आहे. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या बागा व लाखो रुपये खर्च केल्यानंतर ऐन तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. सरकारने तत्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी.

- कैलास आंधळे, प्रगतशील शेतकरी, आंधळेवाडी

===Photopath===

110421\img-20210411-wa0385_14.jpg~110421\img-20210411-wa0376_14.jpg

===Caption===

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंब्यांच्या झाडांना लगडलेल्या कैऱ्यांचा सडा पडला तर पॉली हाऊसचे नुकसान झाले.