शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

धारूर : तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली ...

धारूर

: तालुक्यातील लोनवळ तलावातून भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद करून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे तेलगाव व परिसरातील हजारो हेक्टर जमीन पूर्ववत ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उपळी येथील कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी लोनवळ, तेलगाव, नित्रुड आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला कॅनालव्दारे येत होते. मात्र, कॅनाॅलमध्ये पाणी येण्यापूर्वी लोनवळ तलावात पाणी यायचे. हा तलाव भरल्यानंतर तेथून पुढे कालव्यातून तेलगाव, लोनवळ, नित्रुड येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. मात्र, तलाव भरण्यासाठी पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. तोपर्यंत पाणी पाळी संपते. त्यामुळे कॅनालमध्ये पाणी येतच नव्हते. पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यातच शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरावीच लागत होती. शिवाय जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना कमांड खाली येत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे या भागातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव लगड यांनी उपळी तलावातून येणारे पाणी थेट तेलगावकडे जाणाऱ्या कॅनालमध्ये सोडवण्यासाठी तलावात भूमिगत जलवाहिनी करून त्याव्दारे कॅनालमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. सन २०१८ पासून लगड यांनी हा प्रश्न लावून धरला होता. या मागणीसाठी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन तेलगाव येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. तसेच आ. प्रकाश सोळंके यांची भेट घेऊन लगड यांनी त्यांच्याकडे जलवाहिनीचे काम करण्याची मागणी केली होती. अखेर या कामासाठी तरतूद झाली. या निर्णयाचे काॅ. दत्ता डाके, डाॅ. सुरेंद्र कलंत्री, विष्णूपंत लगड, नवनाथ राठोड, बबन भिसे आदींसह शेतकऱ्यांनी स्वागत केले.

जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट

आ. सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीरतेने दखल घेत जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भागातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जलसंपदा मंत्र्यांनी जलवाहिनीच्या कामास मंजुरी देत तब्बल ५४ लाख रुपयांची तरतूद केली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आ. प्रकाश सोळंके दिली.

शेकडो हेक्टरला होणार लाभ

या कामास येत्या काही दिवसात सुरूवात होऊन लवकरच काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे तेलगाव, लोनवळ, नित्रुड व लगतच्या शिवारातील हजारो हेक्टर शेत जमिनी पूर्ववत जलसिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना खरिपासोबतच रब्बी व उन्हाळी पिके घेणे सुलभ होणार आहे.