शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी ...

बीड : शहरातील मुख्य रस्ता बार्शी नाका ते अण्णाभाऊ साटे चौकात तसेच इतर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. दरम्यान मागील जवळपास वर्षभरापासून ही सिग्नल प्रक्रिया बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी गर्दीची ठिकाणं असलेल्या बार्शीनाका ते साठे चौक, त्यांनंतर सुभाष रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नका या परिसरात सिग्नल लावण्यात आलेले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून ही सर्व सिग्नल प्रणाली बंद आवस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी कायम असते, मात्र वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्यावर आहेत. सिग्नल सुरु असल्यानंतर या रोडवरील पॉईंटवर एक पोलीस कर्मचारी पुरेसा असतो. मात्र, आता एका पॉईंटवर किमान ३ पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्यावर असतात.

सिग्नल नसल्यामुळे वाहतू कोंडी झाल्यावर नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना देखील जास्तीचे श्रम करावे लागतात. त्यामुळे सिग्नल प्रणाली सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी त्याठिकाणी कर्तव्यावर असतात, सिग्नल सुरु झाल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, सिग्नल सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली नगरपालिकेशी वेळोवेळी पत्रव्यावहार करण्यात आला आहे.

कैलास भारती वाहतूक पोलीस प्रमुख

प्रतिक्रिया

शहरातील सिग्नलची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लगात आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ शहरातील सिग्नल सुरु करावेत.

कुलदीप करपे स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिक्रिया

वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल असणे महत्त्वाचे आहे. मात्र, लाखों रुपये दुरुस्तीवर खर्च करून देखील सिग्नल प्रणाली बंद आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱीस्तरावर चौकशी करावी व यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी

राहुल वायकर, संभाजी ब्रिगेड संघटना बीड

प्रतिक्रिया

मुख्य बाजारपेठात वाहतूक कोंडी झाल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सिग्नल सुरु तत्काळ सुरु करणे गरजेचे आहे.

अशोक जगताप, पालसिंगण