शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:42 AM

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

ठळक मुद्देगुरुवारी घेतले होते विष : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड तालुक्यातील ईट येथील एका शेतकºयाने आठवडी बाजारासाठी पैसे नसल्यामुळे मागील आठवड्यात गुरुवारी विष प्राशन केले होते. या शेतकºयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे.आसाराम रावसाहेब नरनाळे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. आसाराम हे बीड तालुक्यातील ईट येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे, शेतीतील उत्पन्न व मोल-मजुरी हा महत्त्वाचा व्यवासाय होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्नात झालेली घट, तसेच शेतातील उत्पन्न नसल्यामुळे मोल-मजूरी देखील मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आसाराम यांना मजुरी मिळत नसल्यामुळे रोजचा खर्च भागवण्याएवढे पैसे देखील मिळत नव्हते. याच मानसिकतेमधून ते खचून गेले होते. मागील गुरुवारी पिंपळनेर येथे आठवडी बाजार होता. मात्र, खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आसाराम यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी आसाराम नरनाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणपत डोईफोडे यांनी दिली.शासनाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून मागील सात महिन्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. यातील सर्वाची कारणे जवळपास सारखी असल्याचे दिसून येते मात्र, तरी देखील आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना प्रभावीणपणे राबवल्या जात नसल्यामुळे आत्महत्या रोखण्यात यश येत नसल्याची तज्ज्ञांचे मत आहे. हे आत्महत्या सत्र रोखायचे असेल तर शासन व प्रशासनाकडून योग्य त्या उपायोजना संबंधीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचतात का यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे गरजचे आहे. तरच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या सत्र थांबू शकते असे मत देखील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या