शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

जिव्हाळ्याच्या मित्र-मैत्रीणीना सोशल मिडीयाने आणले २५ वर्षानंतर एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:35 IST

सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या चेह-यावर यावेळी आंनद ओसंडून वाहत होता.

माजलगाव (बीड), दि. २२ : सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या चेह-यावर यावेळी आंनद ओसंडून वाहत होता. याचवेळी उपस्थित शिक्षकांचा देश-विदेशात पोहचलेल्या आपल्या विद्यार्थ्यांची घौडदौड ऐकून अभिमानाने मान ताठ झाली होती. 

१९९१ ला दहावी पास झाल्यानंतर सिध्देश्वर विद्यालयातुन बाहेर पडलेली विद्यार्थी पुढे आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाली. बघता बघता २५ वर्ष उलटली. यातच कांही वर्गमित्रांनी प्रयत्न करुन शाळेतील त्या वेळचे हजेरीपुस्तक मिळवून त्याच्या आधारे काही जणांचे मोबाईल क्रमांक मिळवले. याच्या आधारे 'जिव्हाळा' नावाचा सोशल मिडीयावर ग्रुप तयार झाला. यावर एकमेकांची खयाली खुशाली कळल्यानंतर सर्वांनी प्रत्यक्ष भेटण्यासाठी 'गेट टुगेदर' घेण्याची संकल्पना पुढे आली. सर्वांनी २० ऑगस्ट या तारखेवर होकार कळवला आणि सर्वानांचा प्रत्यक्ष भेटीचे वेध लागले. 

जर्मनी, चेन्नई, पुणे, मुंबई, कोल्हापुर, औरंगाबाद आदी ठिकाणावरुन मित्रकंपनी आदल्या दिवशीच शहरात दाखल झाली. रविवारच्या कार्यक्रमास तत्कालीन कडकशिस्तीचे मुख्याध्यापक वसंतराव देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, मुलांवर खरे संस्कार घरातून होतात नंतर शाळेतून व समाजातून होतात असे म्हटले. तसेच शिक्षण घेऊन विद्यार्थी चांगला नागरीक व्हावा ही प्रत्येक शिक्षकाची अपेक्षा असते. आपण सर्वच एका चांगल्या समाजाचे पायिक ठरत आपआपल्या भूमिका पार पाडत आहात याचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या मुलांची इतरांशी तुलना करु नका असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मंजुळादास गवते यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

शिक्षक व कर्मचा-यांचा केला सत्कार या विद्याथ्र्यांना इयत्ता १ ली पासुन ते १० वी पर्यंत शिकविणा-या एल.आर. देशपांडे, भगवानराव चौधरी, नारायणराव ठोंगे, आत्माराम सुतळे, गणपतराव ईके, उध्दव नागरगोजे, रत्नमाला देशपांडे, उध्दव शिंदे, अनंताचार्य काशिकर, एन.एम.शिंदे, शिवलाल निचळे, वि.र. कुलकर्णी, अरुण वेळापुरे, प्रा. जनार्धन पटवारी, शंकरलाल ओस्तवाल, संतोष देशमुख, श्रीरंग राठोड, प्रा. लक्ष्मण मस्के, फकीरा देडे, बळीराम सोळंके, बबन कानडे, लक्ष्मण बनसोडे, गोविंद तिडके, कांता हुडवेकर, विमल झरकर, विठल सोनवणे, विलास बोबडे, विठल जोशी, ग्यानबा म्हाळंगे, र.क. गायकवाड सह शिपाई अर्जुनमामा आणि मथुरामावशी आदींचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सावित्री घाटुळ तर सूत्रसंचालन बाळासाहेब झोडगे यांनी केले. आभार राजाभाऊ आवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शैलेश पाठक, नारायण टकले, डॉ. राजेश रुद्रवार, नितीन मुंदडा, सतिश शिंदे, जगदीश पोपळे, डॉ. अजय डाके, बालाजी तिडके, सतिष सोळंके, बळीराम चव्हाण, विनोद जाधव, सुनिल खामकर, संदीप शिनगारे, रामानंद भंडारी, शाम जोशी, डॉ. सदाशिव सरवदे, भारत होके, मधुकर आवारे, डॉ. अशोक तिडके, पुरुषोत्तम करवा, सुदाम बादाडे, वसंत मसलेकर, रामेश्वर करवा आदींनी प्रयत्न केले.