शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

जिव्हाळ्याच्या मित्र-मैत्रीणीना सोशल मिडीयाने आणले २५ वर्षानंतर एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:35 IST

सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या चेह-यावर यावेळी आंनद ओसंडून वाहत होता.

माजलगाव (बीड), दि. २२ : सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या चेह-यावर यावेळी आंनद ओसंडून वाहत होता. याचवेळी उपस्थित शिक्षकांचा देश-विदेशात पोहचलेल्या आपल्या विद्यार्थ्यांची घौडदौड ऐकून अभिमानाने मान ताठ झाली होती. 

१९९१ ला दहावी पास झाल्यानंतर सिध्देश्वर विद्यालयातुन बाहेर पडलेली विद्यार्थी पुढे आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाली. बघता बघता २५ वर्ष उलटली. यातच कांही वर्गमित्रांनी प्रयत्न करुन शाळेतील त्या वेळचे हजेरीपुस्तक मिळवून त्याच्या आधारे काही जणांचे मोबाईल क्रमांक मिळवले. याच्या आधारे 'जिव्हाळा' नावाचा सोशल मिडीयावर ग्रुप तयार झाला. यावर एकमेकांची खयाली खुशाली कळल्यानंतर सर्वांनी प्रत्यक्ष भेटण्यासाठी 'गेट टुगेदर' घेण्याची संकल्पना पुढे आली. सर्वांनी २० ऑगस्ट या तारखेवर होकार कळवला आणि सर्वानांचा प्रत्यक्ष भेटीचे वेध लागले. 

जर्मनी, चेन्नई, पुणे, मुंबई, कोल्हापुर, औरंगाबाद आदी ठिकाणावरुन मित्रकंपनी आदल्या दिवशीच शहरात दाखल झाली. रविवारच्या कार्यक्रमास तत्कालीन कडकशिस्तीचे मुख्याध्यापक वसंतराव देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, मुलांवर खरे संस्कार घरातून होतात नंतर शाळेतून व समाजातून होतात असे म्हटले. तसेच शिक्षण घेऊन विद्यार्थी चांगला नागरीक व्हावा ही प्रत्येक शिक्षकाची अपेक्षा असते. आपण सर्वच एका चांगल्या समाजाचे पायिक ठरत आपआपल्या भूमिका पार पाडत आहात याचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या मुलांची इतरांशी तुलना करु नका असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मंजुळादास गवते यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

शिक्षक व कर्मचा-यांचा केला सत्कार या विद्याथ्र्यांना इयत्ता १ ली पासुन ते १० वी पर्यंत शिकविणा-या एल.आर. देशपांडे, भगवानराव चौधरी, नारायणराव ठोंगे, आत्माराम सुतळे, गणपतराव ईके, उध्दव नागरगोजे, रत्नमाला देशपांडे, उध्दव शिंदे, अनंताचार्य काशिकर, एन.एम.शिंदे, शिवलाल निचळे, वि.र. कुलकर्णी, अरुण वेळापुरे, प्रा. जनार्धन पटवारी, शंकरलाल ओस्तवाल, संतोष देशमुख, श्रीरंग राठोड, प्रा. लक्ष्मण मस्के, फकीरा देडे, बळीराम सोळंके, बबन कानडे, लक्ष्मण बनसोडे, गोविंद तिडके, कांता हुडवेकर, विमल झरकर, विठल सोनवणे, विलास बोबडे, विठल जोशी, ग्यानबा म्हाळंगे, र.क. गायकवाड सह शिपाई अर्जुनमामा आणि मथुरामावशी आदींचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सावित्री घाटुळ तर सूत्रसंचालन बाळासाहेब झोडगे यांनी केले. आभार राजाभाऊ आवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शैलेश पाठक, नारायण टकले, डॉ. राजेश रुद्रवार, नितीन मुंदडा, सतिश शिंदे, जगदीश पोपळे, डॉ. अजय डाके, बालाजी तिडके, सतिष सोळंके, बळीराम चव्हाण, विनोद जाधव, सुनिल खामकर, संदीप शिनगारे, रामानंद भंडारी, शाम जोशी, डॉ. सदाशिव सरवदे, भारत होके, मधुकर आवारे, डॉ. अशोक तिडके, पुरुषोत्तम करवा, सुदाम बादाडे, वसंत मसलेकर, रामेश्वर करवा आदींनी प्रयत्न केले.