शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

Video : दुष्काळात सुखद धक्का ; २४ फुटांवर विहिरीला पाणी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:31 PM

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून विहीर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 

ठळक मुद्देबोअरला देखील ५०० ते ७०० फूट खोल घेऊनही पाणी लागत नाही. ९ वर्षांनी घेतला मुलांनी पोहण्याचा आनंद

- प्रभात बुडूख   

बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील संतोष बलभीम जगताप या शेतकऱ्याच्या विहिरीला भर दुष्काळात अवघ्या २४ फुटांवर पाणी लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून विहीर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 

जिल्ह्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे. विहिरींचे पाणी आटलेले आहे. अशा परिस्थितीत विहिरीला पाणी लागत नाही. बोअरला देखील ५०० ते ७०० फूट खोल घेऊनही पाणी लागत नाही. मात्र, पालसिंगण येथील शेतकरी संतोष जगताप हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे विहीर तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर रोजगार हमी योजनेमधून विहिरीचे काम सुरु केले. सुरुवातीला खडक लागल्यानंतर ओलसर माती लागली नंतर २४ फूटावर काम सुरु असताना मोठा पाण्याचा झरा लागला. त्यानंतर इंजिनच्या साहाय्याने पाणी उपसा करुन ३० फूटापर्यंत विहीर खोदली आहे. पाणी टिकते का हे पाहण्यासाठी दोन दिवस इंजिन सुरु ठेऊन पाणी उपसा केला मात्र, त्यानंतर देखील विहिरीचे पाणी वाढतच होते.

पोहण्याचा आनंद२०१० पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात दुपारी पोहायला जाणे हा नित्यनियम होता. परंतु सततच्या दुष्काळामुळे विहीरी आटल्यामुळे पोहणे बंद झाले होते. मात्र, संतोष यांच्या विहिरीला पाणी लागल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला तर मुलांनी पोहण्याचा आनंद ९ वर्षांनी घेतल्याचे नागरिकांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीमुळे मागील अनेक वर्षांपासून गावात कोणाच्याही विहिरीला एवढ्या मोठ्या व कमी खोलीवर पाणी लागलेले नाही. त्यामुळे खूप आनंद होत आहे.- संतोष बलभीम जगताप, शेतकरी, पालसिंगण 

 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडdroughtदुष्काळFarmerशेतकरी