बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:44 PM2019-03-06T23:44:08+5:302019-03-06T23:45:21+5:30
बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे.
![Number 94 of Bid Municipal Corporation | बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक Number 94 of Bid Municipal Corporation | बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/06-111_201903204155.jpg)
बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक
बीड : बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाने २०१४ साली स्वच्छ सर्वेक्षण ही मोहीम हाती घेतली. सुरूवातीला देशातील केवळ ४४० शहरांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये बीड पालिकेने ३०२ वा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर यात जनजागृती वाढविण्यासह जास्त शहरांना सहभागी करून घेण्यात आले. बीड पालिकेनेही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून २०१७ च्या मोहिमेत ३०२ वा तर २०१८ च्या मोहिमेत ११० व्या क्रमांकावर झेप घेतली. ही यशाची परंपरा पालिकेने कायम ठेवली. २०१९ च्या मोहिमेत ४ हजार ५०० शहरांशी स्पर्धा करीत ९४ वा क्रमांक पटकावला. तर राज्यात २७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, प्रभारी मुख्याधिकारी मिलींद सावंत, उपअभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, महादेव गायकवाड, ज्योती ढाका, भारत चांदणे, शहर समन्वयक विश्वजीत राऊत, कर्मचारी रमेश डहाळे, रमा शिनगारे, स्वाती कागदे, सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मुकादम, कामगारांनी यासाठी परिश्रम घेतले.
असे केले होते नियोजन
शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शहरातील २७ ठिकाणे निश्चित करून एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले. नागरिकांना माहिती देण्याबरोबरच न ऐकणाऱ्यांवर कारवाया केल्या. अनेकांवर फौजदारी गुन्हेही दाखल केले. तसेच ओला व सुका कचारा वेगळा केला. ओला कचºयापासून गांडूळ खत निर्मिती केली. कचरा वेगळा करणाऱ्यांसाठी बक्षिसे ठेवून प्रोत्साहित केले. केलेल्या कागदपत्रांची मांडणी करण्याबरोबरच आॅनलाईन माहिती परिपूर्ण भरली. रस्त्यावर कचरा टाकणाºया डॉक्टर, मंगल कार्यालयांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले.
घंटागाडीला स्पीकर बसवून जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छतेचे आवाहन केले. पालिकेतील शिपायापासून ते मुख्याधिकाºयांपर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरून काम केले. स्वच्छता दूत नियुक्त केले. खाजगी संस्था मदतीला घेतल्या.
अतिक्रमणे हटविण्याबरोबरच अनधिकृत होर्डिंग्ज धारकांवर कारवाई केली. यासारखे नियोजन केल्यामुळेच पालिका टॉप १०० मध्ये आल्याचे सांगण्यात आले.