शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शेती, औद्योगिक विकासासाठी नदीजोड प्रकल्प काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:37 IST

सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत तथा पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक डॉ.दि.मा.मोरे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नदीजोड प्रकल्प राबविल्यास शेतीसह औद्योगिक विकास होऊन ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत तथा पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक डॉ.दि.मा.मोरे यांनी केले.येथे भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता आबासाहेब कोकाटे उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, मराठवाडा व पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ग्रामीण भागासाठी नदीजोड प्रकल्पाची मोठी गरज आहे. नदीजोड ही योजना पूर्वापार चालत आलेली असून इतिहास काळातही याचा उल्लेख आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.अधीक्षक अभियंता आबासाहेब कोकाटे म्हणाले, अवर्षणप्रवण मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प निश्चितपणे उपयुक्त ठरेल. तसेच कृष्णा खोऱ्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.उपअभियंतापदी पदोन्नती मिळालेले सुनील अपसिंगेकर, बंग, वेडे यांच्यासह मिलिंद चिंचपूरकर यांना क्रेडाई व रोटरी तर्फे आदर्श अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महेश कुलकर्णी यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक उत्तमराव मिसाळ, संच्वालन नितीन गोपन यांनी केले. संजय खंदाट यांनी आभार मानले. उत्तमराव मिसाळ, कुलदीप धुमाळे, बलभीम जाहेर पाटील, प्रकाश भांडेकर, पांडूरंगराव तोंडे, सतीश देशपांडे, हरिकिशन सारडा, त्रिंबक देशपांडे, केंडे, देविदास वारकरी, रमेश भालेराव, रावसाहेब वजुरकर, आल्हाद पालवनकर, राहुल बोरा आदींसह नागरिक उपस्थित होते.नदीजोड शक्य मात्र खर्चिकनदीजोड योजना अजिबात अशक्य नाही मात्र खर्चिक असल्याने शासन तिजोरीवर बोजा येणारी आहे. शेतीपेक्षा उद्योगधंद्यावर भर देण्याबाबत सर विश्वेश्वरैय्या यांनी त्या काळी अनेक योजना सांगितल्या आहेत. पर्जन्यमान जास्त असलेल्या कोकणातील वाहून जाणारे आणि समुद्राला मिळणारे पाणी तसेच पूर्व महाराष्ट्रातील नद्यांचे जास्तीचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे शक्य असल्याचे डॉ.मोरे यांनी प्रोजेक्टरद्वारे नकाशासहीत सांगोपांग विवेचन केले.

टॅग्स :riverनदीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी