शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात मुंडे, पंडित कुटुंबात सर्वाधिक आमदार; त्यापाठोपाठ क्षीरसागर, सोळंके घराणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:45 IST

बीड जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत.

बीड : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत तरी घराणेशाही स्पष्ट दिसून आली आहे. परळीचे मुंडे, गेवराईच्या पंडित घराण्यातच आतापर्यंत सार्वाधिक आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही घरांमध्ये मंत्रिपदे आलेली आहेत. त्या पाठोपाठ बीडचे क्षीरसागर आणि माजलगावचे सोळंके कुटुंबही मागे नाही. यांनीही आमदारकीसह मंत्रिपद मिळविलेले आहे. बीड, माजलगाव, परळीतून नवख्यांना फार संधी मिळालेली नाही, हेही वास्तव आहे.

१९६२ नंतर ८९ आमदार झाले आहेत. यामध्ये १० महिलांना संधी देण्यात आली होती. इतर सर्व पुरुष आमदार राहिलेले आहेत. त्या पाठोपाठ कोणाच्या घरात किती आमदार राहिले, याची माहिती घेतली असता, सर्वात अव्वल क्रमांकावर परळीचे मुंडे कुटुंब आहे. त्यांनी परळी आणि रेणापूर अशा दोन मतदारसंघांतून आठ वेळा गुलाल उधळला आहे, तसेच गेवराईच्या पंडितांनीही सात वेळा गुलाल उधळत दुसरा क्रमांक पटकावला आहे. गेवराईमध्ये काही वेळा पवार कुटुंबाने पंडितांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु परळीत मुंडे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार मागील अनेक निवडणुकांमध्ये विजयी झालेला नाही. यंदा या मतदारसंघातून महायुतीकडून धनंजय मुंडे यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार शोधला जात आहे. अद्याप तरी नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे याकडेही लक्ष लागले आहे.

मुंदडा सलग पाच वेळा आमदारकेज मतदार संघातून विमल मुंदडा या सलग पाच वेळा आमदार झालेल्या आहेत. यामध्ये त्यांनी आरोग्यमंत्रीपदही सांभाळले होते. त्यानंतर, २०१९ मध्ये त्यांची सून नमिता मुंदडा आमदार झाल्या आणि दुसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

चार वेळा आमदार, दोन वेळा खासदारगोपीनाथ मुंडे हे रेणापूर मतदारसंघातून १९८० साली पहिल्यांदा आमदार झाले. दुसऱ्या टर्मला पंडितराव दौंड आमदार झाले. त्यानंतर मात्र, सलग चार वेळा मुंडे आमदार राहिले. २००९ साली परळी मतदारसंघातून त्यांनी मुलगी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यांनीही सलग दोन विजय मिळविले, परंतु २०१९ साली पंकजा यांचा पराभव झाला, तर धनंजय मुंडे विजयी झाले. २००९ सालीच गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभा विजयी झाले. २०१४ मध्येही त्यांनी विजय मिळविला. त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळाले, दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे प्रीतम मुंडे खासदार झाल्या. २०१९ मध्येही डॉ.मुंडेच खासदार होत्या. २०२४ ला पंकजा यांना उमेदवारी दिली, परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला.

पंडितांच्या घरातच जास्त काळ आमदारकीशिवाजीराव पंडित दोन वेळा आमदार राहिले त्यानंतर पुतण्या बदामराव पंडित यांनी त्यांच्याच विरोधात अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. बदामराव तीन वेळा आमदार राहिले. मधल्या काळात शिवाजीराव पंडित यांची चिरंजीव अमरसिंह पंडित एक वेळा आमदार राहिले.  शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित यांना काहीकाळ राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली.

आमदार, मंत्री झाले, पण विकासाचे काय?जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत. बीडमध्ये अद्यापही रेल्वे आली नाही, पाण्यासाठी मोठा प्रकल्प नाही. काही भागांत आजही दुष्काळी परिस्थिती आहे. रस्ते, वीज, पाणी आदी समस्या आजही कायम असल्याचे दिसते.

कोणत्या कुटुंबात किती आमदार झाले?गेवराईपवार कुटुंब - ४पंडित कुटुंब - ७--माजलगावसोळंके कुटुंब - ५--बीडक्षीरसागर कुटुंब - ३---चौसाळाक्षीरसागर कुटुंब - ३--आष्टीधस कुटुंब - ३धोंडे कुटुंब - ४--केजमुंदडा कुटुंब - ६सोळंके कुटुंब - १---परळीमुंडे कुटुंब - ३---रेणापूरमुंडे कुटुंब - ५

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parli-acपरळीgeorai-acगेवराईmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवbeed-acबीड