शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

अंबाजोगाई : रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर अनुदान देऊन खतांचे ...

अंबाजोगाई : रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने खतांवर अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.

केंद्र शासनाने खतांचे दर ठरविण्याचे अधिकार संबंधित कंपन्यांना दिल्याने त्यांची मनमानी वाढली आहे. ’इफको’सह इतर खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्थितीत पिकांना खतांचा डोस द्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे खतांचे दर वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला खतांच्या काळ्या बाजारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच लिकिंग ही व्यवस्था त्याच्या माथी मारली जात आहे, अशा अडचणीत शेतकरी अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शासनाने खतांवर विशेष अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत.

शेतकऱ्याला शेती करत असताना रासायनिक खते ही महत्त्वपूर्ण बाब बनली आहे. ऊस, सोयाबीन, गहू, ज्वारी, उडीद, मूग, मका, अशा सर्वच पिकांना डीएपी, युरिया व विविध खतांची सातत्याने गरज भासते. ज्या तुलनेत खतांचे भाव वाढले आहेत. त्या तुलनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. खतांचे वाढलेले भाव, महागडी बियाणे व मजुरीचे वाढलेले दर अशा स्थितीत उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त होते. अशा स्थितीत पुन्हा रासायनिक खतांचे वाढलेले भाव शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहेत. यासाठी राज्य सरकारने अनुदान देऊन खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी कालिदास आपेट यांनी केली आहे.