शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जमीन, जोडणी नाही, तरीदेखील कृषिपंपाचे सव्वालाख वीज बिल भूमिहीन शेतकऱ्याच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. ...

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. वीज जोडणी मिळेना म्हणून परेशान होऊन जमीन विक्री केली व भूमिहीन झाला. तरीसुद्धा वीज न जोडता महावितरण कंपनीने कृषिपंपाचे लाइट बिल शेतकऱ्याच्या माथी मारल्याचे समोर आले आहे.

नांदूरघाटमधील सर्व्हे नंबर ४४ या ठिकाणी २०१० ला दत्ता वैजनाथ जाधव या युवक शेतकऱ्याने एक एकर शेती विकत घेतली. एक एकर बागायती करण्यासाठी २०१४-१५ ला कोटेशन ७००० रुपये भरले. त्या शेतात वीज जोडण्यासाठी सात पोल व वीज तार आवश्यक होती. शासनाच्या नियमाप्रमाणे कोटेशन पूर्ण भरले. वारंवार पाठपुरावा करूनदेखील वीज कंपनीने वीज जोडणी केलीच नाही किंवा साधे पोलसुद्धा मोकळे उभे केले नाहीत. शेवटी हताश होऊन वैतागून शेतकरी दत्ता यांनी २०१६ ला जमीन होती तेवढी विकली व दत्ता भूमिहीन झाले. हॉटेलचा छोटा व्यवसाय करून उपजीविका भागू लागले. एवढे होऊन २०१७ मध्ये वीज वितरण कंपनीने दत्ता यांना ५६८५० रुपये दिले. यावर वरिष्ठांना बोलून व पूर्ण कैफियत वर्तमानपत्रात १४ नोव्हेंबर १७ रोजी मांडून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावर वरिष्ठांनी चुकून झाले, दुरुस्त होऊन जाईल असे सांगितले. एवढे होऊन डिसेंबर २०२० मध्ये आणखी वीज वितरण कंपनीचे लोक दत्ता जाधव यांच्याकडे आले व तुमच्या शेताचा सर्व्हे करायचा आहे, बिल खूप थकले आहे. गुन्हा दाखल होईल पैसे भरा असे सांगितले. तुम्हाला १२५४१० रुपये वीज बिल आले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरून घ्या, असे सांगितले. हे सर्व पाहून व बोलणे ऐकून दत्ता यांची मनस्थिती खराब झाली. ज्या जमिनीसाठी कोटेशन भरले ते कोटेशन परत दिलेच नाही, तेथे लाइट नाही व जोडणी नाही. चार वर्षे झाले. वैतागून जमीन विकली, तरीपण वीज बिल आलेच कसे, या प्रश्नाने दत्ता यांचे मानसिक संतुलन अस्थिर झाले. याला जबाबदार असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव कुटुंबियांनी केली आहे.

मला वीज कधी दिली नाही, माझे भरलेले कोटेशन परत दिले नाही. वैतागून जमीन चार वर्षांपूर्वी विकली. आता तर सव्वालाख बिल माझ्या नावे आले आहे, मला न्याय हवा.

-दत्ता वैजनाथ जाधव, नांदूरघाट

त्या शेतकऱ्याला नांदूरघाट येथील ऑफिसला अर्ज द्यायला सांगा. वीज जोडली नाही; परंतु बिल आले म्हणून अर्ज द्या. आम्ही कार्यवाही करतो. बिल बंद करून टाकू व आलेली रक्कम माफ करून टाकू. या सर्व प्रकरणाची मी स्वतः चौकशी करून त्या शेतकऱ्याला न्याय देईन.

-आंबेकर (अभियंता, केज)