शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पती पत्नीवर तलवार चाकूने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:04 IST

बीड : घरासमोर थांबून शिवीगाळ करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीवर १३ जणांनी तलवार, चाकू आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी ...

बीड : घरासमोर थांबून शिवीगाळ करण्यास मज्जाव करणाऱ्या व्यक्तीवर १३ जणांनी तलवार, चाकू आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी पतीला वाचविण्यासाठी धावत आलेल्या पत्नीवरही हल्लेखोरांनी चाकूने वार केले. ही घटना बीड शहरातील एकता नगर भागात बुधवारी रात्री घडली.

संतोष रमेश जाधव ( रा. एकता नगर, बीड) असे हल्ल्यातील जखमी व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजता ते घरी असताना घराबाहेर मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून डोकावले असता भैय्या साळवे, सौरभ साळवे, सचिन साळवे, आकाश कोकाटे, भरत कांबळे, अशोक वाघमारे, अजय राठोड, अनिल वीर आणि अनोळखी पाच जण कोणालातरी फोनवरून शिवीगाळ करत असल्याचे दिसले. घरात महिला असल्याने तिथे थांबून शिवीगाळ करण्यास जाधव यांनी मज्जाव केला. तेंव्हा त्यांनी जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर घराबाहेर आलेल्या संतोष जाधव यांच्यावर त्यांनी तलवार, चाकू, दगड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात तलवारीचा डोक्यावरील वार अडविताना जाधव यांच्या हाताला गंभीर जखम झाली. संतोष यांचा आरडाओरडा ऐकून पत्नी उषा यांनी त्यास वाचविण्यासाठी धाव घेतली असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील चाकूने वार करून जखमी केले. जाधव दांपत्याचा आरडाओरडाऐकून नातेवाईक आणि गल्लीतील इतर लोक धावून येत असल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले. जखमी संतोष जाधव यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्यांच्या जबाबावरून सर्व १३ हल्लेखोरांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि जमदाडे हे करत आहेत.

चौकट,

पेठबीड पोलिसांचा वचक नाही

शहरातील पेठ बीड भागात टवाळखोरांचा त्रास मागील काही दिवसांपासून वाढलेला आहे. त्यामुळे त्यापरिसरात राहणाऱ्या व्यापारी तसेच सर्वसामान्य नागिरकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पेठ बीड पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असून, अशा टवाळखोरांवर पोलिसांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. तर, पोलीस अधीक्षकांनी याची नोंद घेऊन ठाणेप्रमुखांना जाबाबदारीची जाणीव करून द्यावी अशी मागणी रहिवाश्यांमधून केली जात आहे.