शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

मांडवा गावाजवळील जंगलात भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:19 IST

: वनविभागासोबतच नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किमी अंतरावर असलेल्या मांडवा ...

: वनविभागासोबतच नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किमी अंतरावर असलेल्या मांडवा गावाजवळील वाण नदीच्या किनाऱ्यावरील डोंगरावरील जंगलास २७ मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या वणव्यात १० हेक्टर डोंगर जळून खाक झाला असल्याची माहिती वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.

२७ मार्च रोजी दुपारी मांडवा गावाजवळील वान नदीच्या एका डोंगर उतारावर ही आग लागली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी अंबाजोगाई, परळी क्षेत्रातील वन विभागातील कर्मचाऱ्यांना ताबडतोब एकत्र बोलावून आणि मांडवा ग्रामस्थांच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग डोंगर उतारावरील एका दरीत लागली असल्याचे सांगण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी फायर गाड्यांचा उपयोग करण्यात आला.

वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.

१० हेक्टर डोंगर जळाला

या आगीत डोंगर दरीतील १० हेक्टर भागातील गवत व पालापाचोळा जळून खाक झाला. या क्षेत्रात कसल्याही प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली नसल्यामुळे मोठी हानी टळल्याचे वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राउंड फायर पद्धतीचा उपयोग करून ही आग आटोक्यात आणली असल्याचे भगवान गित्ते यांनी सांगितले.

वनअधिकारी, नागरिकांनी दक्षता बाळगावी

दरम्यान अशा बाबतीत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी अधिकची दक्षता बाळगावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी केले आहे.

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नंतर जून महिन्याच्या शेवटपर्यंत असा वणवा लागण्याची शक्यता असते. वणवा हा तीव्र उष्णतेने लागू शकतो. बऱ्याचदा वणवा मानवाच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा लागतो. जंगलात सुकलेल्या पानांचा जाळ करताना व काही लोक नवीन चांगले गवत उगवावे म्हणून शिवार आणि सुकलेल्या जमिनीचा काही पट्टा पेटवून देतात. मधाचे पोळे जाळताना आगीचा उपयोग सुद्धा वणव्याला निमंत्रण देते. वृक्षारोपणाबरोबरच अपघात टाळणेही महत्त्वाचे आहे. वनविभागाच्या मालकीच्या जागेत असणाऱ्या वनराईच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी याबाबत विशेष दक्षता व काळजी घेणे आवश्यक आहे असे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी सांगितले.