शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून घरातच, मुलेही कंटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

अंबाजोगाई : मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लॉकडाऊन झाली असून, ...

अंबाजोगाई : मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हापासून शाळा बंद आहेत. बंद शाळांमुळे मुले घरातच लॉकडाऊन झाली असून, कोरोनाच्या भीतीने पालकही मुलांना घराबाहेर पाठवत नाहीत. त्यामुळे मुलांमध्ये अनेक बदल जाणवत आहेत. विशेषतः मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. त्यामुळे पालकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

मागीलवर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले. परिणामी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यानंतर कालांतराने कोरोना लाट जशी कमी झाली, त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढतच चालल्याने शाळा ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला गेला, तर शाळेसोबत खासगी क्लासेसवालेही ऑनलाईन शिकवण्या घेत असल्याने मुलांचा बहुतांश वेळ ऑनलाईन शिक्षणातच जाऊ लागला. परिणामी वर्षभरापासून मुले घरातच कोंडली गेलेली आहेत.

मुक्तपणे मैदानावर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांना आता मोबाईल व टीव्हीव्यतिरिक्त मनोरंजनासाठी दुसरे साधन शिल्लक नाही. घराबाहेर पडण्यासाठी पालकांचा मज्जाव आहे. एकाच ठिकाणी बसून मुले कंटाळली आहेत. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. पालकांनाही आपल्या मुलांची चिंता सतावत आहे. आपल्या मुलांचा तणाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत गप्पा, गोष्टी कराव्यात. तसेच छोटे-मोठे खेळ खेळावेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शारीरिक आरोग्यावर परिणामांची भीती

कोरोनामुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले. मुलांना घरीच रहावे लागत आहे. टीव्ही व मोबाईलवरच वेळ घालविणे सुरू आहे. मित्र, सवंगडी भेटत नसल्याने मुलांचे मैदानी खेळ खेळणेच बंद झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी मुलांची मानसिकता समजून त्यांना वेळ द्यावा - डॉ.प्रसाद कुलकर्णी,

बाल रोगतज्ज्ञ, अंबाजोगाई.