शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

लपलेले चेहरे दिसू लागले, वाढदिवस, उपक्रम वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

अंबेजोगाई : नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. गेल्या अनेक वर्षांत न फिरकणारे नगरसेवकही खडबडून जागे ...

अंबेजोगाई : नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल आता शहरवासीयांनाही लागली आहे. गेल्या अनेक वर्षांत न फिरकणारे नगरसेवकही खडबडून जागे झाले आहेत. या निमित्ताने आता रखडलेल्या समस्याही ऐरणीवर आल्या आहेत, तर अनेकांनी आता विविध उपक्रम व कार्यक्रम सुरू केले आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे ठप्प राहिले. अंबेजोगाई शहर एप्रिल व मे महिन्यांत कोरोनाचे हॉटस्पॉट राहिले. शहरात हजारो जणांना कोरोनाची बाधा झाली, तर शेकडो जणांचा बळी गेला. जून-जुलैपासून परिस्थिती नियंत्रणात आली. अनेक कुटुंबांवर संकटांचा डोंगर कोसळला. यात अनेक जण सावरले, पण कुटुंबातील सदस्य गमावल्याची रुखरुख आजही अनेकांच्या मनात आहे. अशा कठीण प्रसंगांत कोण कोणाच्या मदतीला धावून आले, कोणाची मदत कशी झाली, कोणी कोणाला बगल दिली. या सर्व गोष्टींची उकल आता सुरू झाली आहे. शासनाने कडक निर्बंध दूर करून, बाजारपेठेसह अनेक गोष्टी खुल्या केल्या आहेत. त्यातच न्यायालयानेही आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेवर घ्या, असे शासनाला सुचविल्याने नगरपरिषदेच्या निवडणुका लवकरच लागतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

डिसेंबर महिन्यात नगरपरिषदेचा कालावधी संपतो. जर निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या, तर तीन महिन्यांत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच कमी झालेले निर्बंधामुळे अनेकांनी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कामाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांनंतर या वर्षीचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होताना दिसला, तर आता इच्छुकांचे वाढदिवसही जोरात होऊ लागले आहेत. शहरात हळूहळू बॅनरबाजी जोर धरू लागली आहे. वाढदिवसानिमित्त जेवणावळी वाढल्या आहेत. प्रभागात रखडलेली कामे, निर्माण झालेल्या समस्याही अचानक ऐरणीवर आल्या आहेत, तर राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकही आता दररोज नगरपरिषद कार्यालयात दिसू लागले आहेत. एकूणच राजकीय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शहरातही आता नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा होऊ लागली आहे. नवीन इच्छुकांनीही कोणी सेवेच्या तर कोणी बॅनरबाजीच्या माध्यमातून आपण भावी उमेदवार आहोत, अशी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकंदरीत दीड वर्षापासून झालेले शांततामय वातावरण मात्र आता राजकीय रंग घेऊ लागले आहे.