शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ही निवडणूक माझ्या अस्तित्वाची, एक संधी द्या - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:10 IST

परळी : दोन वेळा लेकींना आशीर्वाद दिले, मतदारसंघाचा काय विकास झाला? हे आपणासही माहीत आहे. २४ वर्षे मी आपली ...

ठळक मुद्देदोन वेळा लेकींना संधी देऊनही परळी मतदार संघाचा विकास झाला नाही; मी मात्र २४ वर्षे विकासासाठी झटतोय

परळी : दोन वेळा लेकींना आशीर्वाद दिले, मतदारसंघाचा काय विकास झाला? हे आपणासही माहीत आहे. २४ वर्षे मी आपली सेवा करतो आहे, आता या लेकाला आशीर्वाद द्या. परळी मतदार संघात विकास आणून पाच वर्षात चेहरा मोहरा बदलेल. ही निवडणूक माझ्यासाठी अस्तित्त्वाची आहे. सत्तेत नसतानाही मी परळीसाठी, मतदारसंघासाठी झिजतोय. सत्तेत असताना तुमच्या लेकीनी परळीसाठी काय केले, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे परळी शहरात जोरात स्वागत करण्यात आले. अजित पवार, खा.अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचे भव्य रॅलीने परळीत स्वागत करण्यात आले. यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण पाच वर्षात पूर्ण झाले नाही, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री असतानाही आमच्या ताईसाहेबांना माजलगाव धरणाचे पाणी परळीच्या नागापूर धरणात आणता आले नाही, परळीत एमआयडीसी करता आली नाही, ‘वैद्यनाथ कारखाना’ शेतकऱ्यांचे पैसे देत नाही. मी जनतेच्या सेवेसाठी २४ वर्षे राबतोय, १०० एकर जमीन विकली पण कोठे ही कमी पडलो नाही. तुम्ही दोन वेळा लेकींना संधी दिली आहे, यावेळी तुमच्या या लेकावर विश्वास टाकून संधी द्या, संपूर्ण महाराष्टÑात परळीची राजकीय ताकद वाढवून बारामतीसारखा विकास करवून दाखवेल, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.अजित पवार म्हणाले की, राज्यात ४५ वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नाही, तेवढी या दळभद्री सरकारच्या काळात वाढली. राज्यात मंदी वाढली पण मुख्यमंत्री फडणवीस यावर मार्ग काढायला तयार नाहीत. उद्योजकाना काय अडचणी आहेत हे विचारीत नाहीत, मुख्यमंत्री हे दिशाभूल करीत आहेत. राज्य विकासाच्या बाबतीत देशात तीन नंबरवर आहेत, असे सांगत आहेत, हे खोटे आहे. मुलींवरील अत्याचारात नंबर तीनवर आहे. या सरकारच्या काळात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता फडणवीससाहेब कोणावर ३०२ दाखल करायचा असा प्रश्न अजित पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. ही निवडणूक महाराष्ट्रची आहे , या सरकारने पाच वर्षात काय केले हे मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे. आम्ही सत्तेवर आल्यास कर्ज माफी करू, शिक्षकासह इतर रिक्त पदे भरू, असे आश्वासनही पवार यांनी दिले. बीड जिल्ह्यात युती सरकारने एकही कारखाना आणला नाही. तसाच मराठवाड्यावरही अन्याय केला. परळी - बीड - अहमदनगर रेल्वे मार्गाचे कामही अतिशय धिम्या गतीने चालू आहे. मंत्र्यांचे साखर कारखाने शेतकºयांचे पैसे देत नाही. आमचे सरकार निवडून आणा. बीड जिल्ह्यात सहा आमदार निवडून आणा. या बीड जिल्ह्याला सत्तेत महत्त्वाचे पदे देऊ असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.सांगली, कोल्हापूर, साताºयातील पुरास महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाजपाचे सरकार जबाबदार आहे. या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नव्हता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आलमपट्टी धरणाचे दरवाजे वेळेवर उघडले नसल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये भयावह अशी पूरस्थिती निर्माण झाली आणि या भागाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लोक रस्त्यावर आले, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.शिवस्वराज्य रॅलीने परळीत स्वागतराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवनेरी येथुन सुरू केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे २३ आॅगस्ट रोजी परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेचा बीड जिल्ह्यात ३ दिवस मुक्काम राहणार आहे.शुक्र वारी सायंकाळी पाच वाजता परळी तालुक्यातील धर्मापूरी रोड येथून परळीत आगमन झाले. धर्मापूरी रोड येथून दुचाकी मोटार सायकल रॅलीने या शिवस्वराज्य यात्रेचे परळी शहरात स्वागत करण्यात आले. ही यात्रा अंबाजोगाईकडे शनिवारी सकाळी निघणार आहे.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवार