शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मावेजासाठी शेतकऱ्यांचे टोल नाक्यावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST

अंबाजोगाई : रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नसताना टोल वसुली मात्र सुरु ...

अंबाजोगाई : रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नसताना टोल वसुली मात्र सुरु करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सेलू अंबा येथील टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. आधी मावेजा द्या, नंतरच टोल वसुली करा अशी मागणी यावेळी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.‌ माधव जाधव यांनी केली.

मावेजाची जवळपास ४५ कोटींची रक्कम प्रलंबित असताना आणि उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असतानाही टोल वसुली मात्र घाईने सुरु करण्यात आली. त्यामुळे सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी ॲड.‌ माधव जाधव यांच्या समवेत टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. यावेळी माकपचे कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.या आंदोलनात जगन्नाथ बरुरे, प्रवीण वाघमारे, ईश्वर शिंदे, महेश किर्दंत, रमेश कुडके, बंकट लोमटे, इंद्रजीत जाधव, उमेश देशमुख, प्रदीप लोमटे, धनराज कोळगीरे, सिराजखान पठाण, बालाजी लाड, दत्तात्रय गंगणे, शैलजा औताडे, अ.भा.किसान काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, सतीश भगत, महादेव वाघमारे, सुमतीबाई औताडे, संभाजी वाळवटे , निलेश देशमुख, सतीश भांडे आदींनी सहभाग घेतला.

तहसीलदारांना निवेदन

मावेजाच्या मागणीसह रस्ता आणि पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसूल करू नये, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल माफी द्यावी, सायगाव, सेलू अंबा येथे सर्व्हिस रोड द्यावा या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गणेश सरोदे यांना देण्यात आले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजाभाऊ औताडे यांनी टोल नाक्याच्या पाच किमी परिघातील सर्व वाहनांना टोल माफी देण्याची मागणी केली.

कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

रेणापूर ते लोखंडी सावरगाव या ५४८-ब क्रमांकाच्या महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. परंतु, वाघाळा येथील ३५, सेलू आंबाच्या ११ आणि अंबाजोगाई ग्रामीणमधील १३ अशा एकूण ६९ शेतकऱ्यांना तीन वर्षे उलटूनही अद्याप मावेजा मिळालेला नाही. अंबा साखर कारखान्यालाही मावेजा दिला. मात्र गरजवंत शेतकऱ्यांचा मावेजा देताना कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या

आधी शेतकऱ्यांना मावेजाची रक्कम द्या, रस्त्याचे आणि पुलाचे काम पूर्ण करा आणि नंतरच टोल वसुली करा. गुत्तेदाराचे हित जोपासण्याआधी मावेजापासून वंचित शेतकऱ्यांच्या अडचणीही प्रशासनाने समजून घ्याव्यात.

- ॲड.‌ माधव जाधव, मराठवाडा अध्यक्ष, अखिल भारतीय किसान काँग्रेस