शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो सावधान, पेरणीची घाई करू नका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

अविनाश कदम लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : शेतकरी पावसाळा सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू करतात. पुन्हा पावसाने उघडीप ...

अविनाश कदम

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : शेतकरी पावसाळा सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू करतात. पुन्हा पावसाने उघडीप दिल्यावर नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला आष्टी कृषी विभागाने दिला आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरेसा पाऊस नाही. काही गावांमध्ये पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. तरी काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरणी झालेल्या गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी पावसाने अशी ओढ दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी किमान ७ इंच ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन आष्टी कृषी विभागाच्यावतीने केलेले आहे.

कडा, धामणगाव, धानोरा, आष्टी तालुक्यांच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. तर आष्टीच्या पूर्वेकडील गावात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील ४ ते ५ दिवसांपासून दमदार पाऊस झाला नाही. येत्या २ ते ४ दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

.....

पेरणीयोग्य पावसानंतरच पेरणी करा

जोपर्यंत ८० ते १०० मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसतो. जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येऊ शकते. यामध्ये आर्थिक फटका बसतो. पैसे आणि वेळपण अधिक खर्च होतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

-राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

...

सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. यंदा पाऊस चांगला राहील या आशेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीस प्रारंभ केला होता. कऱ्हेवडगांव परिसरातील संपूर्ण पेरणीची कामेदेखील पूर्ण झाली आहेत. आठ दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी झालेली पिके आता कुठे वर दिसू लागताच कडक उन्हामुळे ती करपण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

- राम नागरगोजे, शेतकरी, कऱ्हेवडगांव

.....

मंडळनिहाय पर्जन्यमान

आष्टी - ६३.५ मि.मी.

कडा - ६०.२ मि.मी.

टाकळसिंग - ४५.४ मि.मी.

दौलावडगांव - ६५.९ मि.मी.

धामणगांव - ५१.४ मि.मी

धानोरा - ३८.६ मि.मी.

पिंपळा - १२२ मि.मी.