शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाडीच्या ग्रामस्थांचा वनवास संपेना; पुलाअभावी २५ कि.मी.चा हेलफाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

परळी : तालुक्यातील दत्तवाडी (वनवासवाडी) गावच्या आंधारेश्वर मंदिराजवळील तळ्यामध्ये मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम सध्या अर्धवट असल्याने या ...

परळी : तालुक्यातील दत्तवाडी (वनवासवाडी) गावच्या आंधारेश्वर मंदिराजवळील तळ्यामध्ये मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम सध्या अर्धवट असल्याने या गावातील लोकांचा जवळील अंतरावरून परळीशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याप्रश्नी परळीच्या उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांची ग्रामस्थांनी बुधवारी भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

परळीपासून ९ किलोमीटर अंतरावर ५०० लोखसंख्येचे दत्तवाडी हे गाव असून, ते मालेवाडी ग्रामपंचायतअंतर्गत येते. या गावाला चांदापूर फाट्यावरून मालेवाडी, दत्तवाडी, हेळंब, दौंडवाडी, सेवा नगर तांडा ही गावे पुलाच्या रस्त्याशी जोडली गेली आहेत. याच रस्त्यावर दत्तवाडी गावच्या जवळ अंधारेश्वर मंदिराजवळ तळ्यामध्ये जुना मोऱ्यांचा पूल होता. त्याच पुलावर नवीन पूल मंजूर झाला आहे. त्याचे काम तळ्याचे पाणी कमी झाल्याशिवाय करता येत नाही. दहा दिवसांपासून येथील तळ्यातील पाण्यात वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये संबंधित एजन्सीला काम मिळाले. वेळीच काम झाले सुरू केले असते तर हे काम पूर्ण झाले असते. काम करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ होता. संथ गतीने झाल्याने सध्या तलावातील पाण्यामुळे पुलाचे काम बंद आहे. बुधवारी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पर्यायी रस्ता करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी पाटलोबा गीते, केशव गीते, प्रसराम गीते, माणिक गीते, महादेव गुट्टे, बाबुराव गीते, भास्कर गीते, लिंबाजी बदने, राम कसबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यायी मार्ग लांबचा

पुलाअभावी मौजे दत्तवाडी गावातील लोकांना परळीशी संपर्क करता येत नाही. हे अंतर नऊ किलोमीटर आहे. हेळंबमार्गे परळीला यावे लागत आहे. गावची मुख्य बाजारपेठ परळी आहे. या गावात ५०० लोकसंख्या आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय दूध, भाजीपाला विकणे हा आहे. या कामासाठी परळीला सध्या २५ कि. मी. अंतरावरून सारडगावमार्गे हेलफाटा मारून यावे लागत आहे, तर दौंडवाडी दत्तवाडीमार्गे परळी बारा किलोमीटर आहे, तर आता दौंडवाडी घाटनांदूरमार्गे २० किलोमीटर अंतर कापून यावे लागत आहे.

----------

तलावातील पुलाचे काम वेळेत न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शासनाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून द्यावी - पाटलोबा गीते.

----------

मौजे दत्तवाडी येथील ग्रामस्थांना परळीला येण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सूचित केले आहे. - सुरेश शेजूळ, तहसीलदार, परळी

--------

290721\29bed_1_29072021_14.jpg