शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

कोरोनामुळे वर्षभर आरोग्य विभागच """"व्हेंटीलेटरवर""""

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST

२४ तास ऑन ड्यूटी : क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह शब्दांनी उडवली झोप बीड : वर्षांच्या सुरूवातीपासूनच कोरोनाची दहशत निर्माण ...

२४ तास ऑन ड्यूटी : क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह शब्दांनी उडवली झोप

बीड : वर्षांच्या सुरूवातीपासूनच कोरोनाची दहशत निर्माण झाली. प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार आदी कामे करण्यासाठी आरोग्य विभाग २४ तास ऑन ड्यूटी होता. कधीतरी कानी पडणाऱ्या क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या शब्दांनी तर झोपच उडवली होती. यामुळे २०२० या वर्षात आरोग्य विभागच ''''''''व्हेंटीलेटरवर'''''''' राहिला होता. त्यांच्या कामाचे सामान्यांकडून कायम कौतुक करण्यात आले.

जानेवारीच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात कोरोनाची दहशत आली. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. तसेच जिल्ह्यात १८ ठिकाणी नाकाबंदी करून बाहेरून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना इन्स्टिट्यूशनल, होम क्वारंटाईन केले. नंतर जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक उसतोड कामगारांची आरोग्य तपासणी केली. राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना बीड जिल्ह्यात कोरोना वेशीवरच रोखला होता. १६ एप्रिल रोजी आष्टी तालुक्यातील ईटकुरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तात्काळ ३ किमी पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन करून विशेष पथकासह १२ दिवस तपासणी आणि सर्वेक्षण केले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत कंटेनमेंट झोन आणि सर्वेक्षण सुरू राहिले. नंतर रुग्ण वाढले आणि हे बंद झाले. या वर्षभरात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्यासह शिपाई ते अधिकारी या सर्वांनीच २४ तास काम केले. नियंत्रण कक्षातील सर्वांनीच खूप परिश्रम घेतले.

थोरातांची बदली, गित्ते रूजू

तीन वर्षे कालावधी पूर्ण झाल्याने डॉ.अशोक थोरात यांची बदली होऊन त्यांच्या जागी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सूर्यकांत गित्ते रूजू झाले. त्याबरोबच केज, रायमोहा, पाटोदा, गेवराई, नेकनूर, आष्टी येथेही हक्काचे वैद्यकीय अधीक्षक मिळाले.

कोरोनामुळे शस्त्रक्रिया घटल्या

कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाले होते. सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनातच व्यस्त होती. यामुळे ओपीडी, आयपीडी आणि किरकोळ शस्त्रक्रिया गतवर्षीच्या तुलनेत घटल्या.

कोरोना मृत्यू रोखण्यात अपयश

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यश आले असले तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश आले. उपचार आणि सुविधांबद्दल कायम तक्रारी राहिल्या. आजही राज्य आणि देशाच्या तुलनेत जिल्ह्याचा डेथ रेट दुप्पट आहे.

मुलींचा जन्मदर वाढला

जिल्ह्यात २०२० मध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. १ हजार मुलांमागे ९४७ मुली आहेत. तसेच बालमृत्यू आणि बालविवाहाचेही प्रमाण कमी झाले आहे. परंतु राष्ट्रीय कुटूंब सर्वेक्षणानुसार पुरूषांपेक्षा महिलांना जास्त टेन्शन असल्याचेही समोर आले आहे.