शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कोरोनामुळे वर्षभर आरोग्य विभागच """"व्हेंटीलेटरवर""""

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST

२४ तास ऑन ड्यूटी : क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह शब्दांनी उडवली झोप बीड : वर्षांच्या सुरूवातीपासूनच कोरोनाची दहशत निर्माण ...

२४ तास ऑन ड्यूटी : क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह शब्दांनी उडवली झोप

बीड : वर्षांच्या सुरूवातीपासूनच कोरोनाची दहशत निर्माण झाली. प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार आदी कामे करण्यासाठी आरोग्य विभाग २४ तास ऑन ड्यूटी होता. कधीतरी कानी पडणाऱ्या क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या शब्दांनी तर झोपच उडवली होती. यामुळे २०२० या वर्षात आरोग्य विभागच ''''''''व्हेंटीलेटरवर'''''''' राहिला होता. त्यांच्या कामाचे सामान्यांकडून कायम कौतुक करण्यात आले.

जानेवारीच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात कोरोनाची दहशत आली. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. तसेच जिल्ह्यात १८ ठिकाणी नाकाबंदी करून बाहेरून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना इन्स्टिट्यूशनल, होम क्वारंटाईन केले. नंतर जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक उसतोड कामगारांची आरोग्य तपासणी केली. राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना बीड जिल्ह्यात कोरोना वेशीवरच रोखला होता. १६ एप्रिल रोजी आष्टी तालुक्यातील ईटकुरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तात्काळ ३ किमी पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन करून विशेष पथकासह १२ दिवस तपासणी आणि सर्वेक्षण केले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत कंटेनमेंट झोन आणि सर्वेक्षण सुरू राहिले. नंतर रुग्ण वाढले आणि हे बंद झाले. या वर्षभरात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्यासह शिपाई ते अधिकारी या सर्वांनीच २४ तास काम केले. नियंत्रण कक्षातील सर्वांनीच खूप परिश्रम घेतले.

थोरातांची बदली, गित्ते रूजू

तीन वर्षे कालावधी पूर्ण झाल्याने डॉ.अशोक थोरात यांची बदली होऊन त्यांच्या जागी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सूर्यकांत गित्ते रूजू झाले. त्याबरोबच केज, रायमोहा, पाटोदा, गेवराई, नेकनूर, आष्टी येथेही हक्काचे वैद्यकीय अधीक्षक मिळाले.

कोरोनामुळे शस्त्रक्रिया घटल्या

कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाले होते. सर्व आरोग्य यंत्रणा कोरोनातच व्यस्त होती. यामुळे ओपीडी, आयपीडी आणि किरकोळ शस्त्रक्रिया गतवर्षीच्या तुलनेत घटल्या.

कोरोना मृत्यू रोखण्यात अपयश

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यश आले असले तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश आले. उपचार आणि सुविधांबद्दल कायम तक्रारी राहिल्या. आजही राज्य आणि देशाच्या तुलनेत जिल्ह्याचा डेथ रेट दुप्पट आहे.

मुलींचा जन्मदर वाढला

जिल्ह्यात २०२० मध्ये मुलींचा जन्मदर वाढला आहे. १ हजार मुलांमागे ९४७ मुली आहेत. तसेच बालमृत्यू आणि बालविवाहाचेही प्रमाण कमी झाले आहे. परंतु राष्ट्रीय कुटूंब सर्वेक्षणानुसार पुरूषांपेक्षा महिलांना जास्त टेन्शन असल्याचेही समोर आले आहे.