शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडींमध्ये दुप्पट वाढ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST

डेंग्यू, टायफाईडचे अनेक रुग्ण, थंडी-तापाचीही साथ अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे ...

डेंग्यू, टायफाईडचे अनेक रुग्ण, थंडी-तापाचीही साथ

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे पालक चिंतेत आहेत. कोरोनाच्या भीतीखाली असलेल्या पालकांना आता मुलांच्या आजाराची काळजी लागली आहे.

सध्या शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मुलांना उपचारासाठी आणले जात आहे. त्यामध्ये साधारणत: सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आहेत. रुग्णालयात तापाची औषधे देऊन उपचार केले जात आहेत. त्यानंतरही आजार कमी न झाल्यास मात्र डेंग्यू तसेच टायफाॅईडची चाचणी केली जात आहे. काही मुलांना डेंग्यूची लक्षणे आढळल्यानेही चिंता वाढली आहे. मुलांना डासांपासून सुरक्षित ठेवण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.

एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात थंडीताप व व विविध आजारँचे रुग्ण वाढल्याने एकाच कॉटवर दोन-दोन रुग्ण ठेवण्याची वेळ बालकक्षात आली होती. मात्र आता ही स्थिती कमी झाली आहे.

डेंग्यू-मलेरियाची चाचणी

ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेल्या मुलांना उपचार दिल्यानंतरही आजार कमी न झाल्यास डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली जात आहे. शहरात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत जवळपास ४० रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच खासगी रुग्णालयातही रुग्ण असल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे.

बालरोगतज्ज्ञ म्हणतात....

सध्या पावसाच्या दिवसात मुलांना आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. यात वातावरणातील बदल हे एक कारण आहेच; पण त्याच वेळी दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडू शकतात. घर व परिसरातील स्वच्छता या काळात अत्यंत गरजेची आहे.

- डॉ. रमेश लोमटे, बालरोगतज्ज्ञ, अंबाजोगाई.

लहान मुले पावसात खेळतात, भिजतात. यातून सर्दी, ताप असे आजार होतात. डासांपासून मलेरिया, डेंग्यू या आजारांची भीती आहे. त्यामुळे या काळात सांभाळणे गरजेचे आहे. सकस आहार ही मुलांच्या आरोग्यात महत्त्वाची बाब आहे.

- डॉ.प्रसाद कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, अंबाजोगाई

अनेक मुलांची होतेय कोरोना चाचणी

कोरोना संशयित मुलांची चाचणी करण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत. ग्रामीण भागात पहिल्या लाटेतही अनेक लहान मुले बाधित झाली होती. मात्र आता हे तापाचे आजार वाढल्याने काळजीपोटी स्वतः पुढाकार घेत पालकही आपल्या बालकांची कोरोना चाचणी करून घेऊ लागले आहेत.

ही घ्या काळजी

१. मुलांना डास चावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

२. स्वच्छ पाण्यातील डास धोकादायक असतात. यातून डेंग्यू होऊ शकतो.

३. घरासह परिसर स्वच्छताही या काळात अत्यंत महत्त्वाची आहे.