शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धारूरमध्ये होळीपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस चाचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी ...

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी चाचर (फेरी) काढण्यात येते. शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी गीते गावून रंगांची उधळण करण्यात येते. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करीत परंपरा खंडित होऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात हा सण राजपूत समाजाच्या वतीने आगळावेगळा साजरा केला जातो. या सणासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी गावी येतात. पाच दिवस थांबतात. धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. यात मिश्रा, हजारी, शुक्ला, दुबे, तिवारी, सददीवाल यांचा समावेश असतो. चाचरसाठी पाच पंच नेमले आहेत. पाच दिवस चाचर साजरी केली जाते. चाचरीचा खर्च प्रत्येक दिवशी एका कुटुंबाकडे असतो. ढोलकी, झांजच्या वाद्यावर गाणी गात कटघरपुरा येथील हनुमान मंदिरापासून चाचरीला सुरुवात करण्यात येते. काशीनाथ चौकापासून सोमवार चौकातील बालाजी मंदिरापर्यंत चाचर काढण्यात येते. यावेळी ‘सिया रघुवीर बरसो एैसो, सिया रघुवीर बरसो एैसो’ अशी गीते गायिली जातात. बालाजी मंदिरात सांगता होते. सायंकाळीही चाचर काढण्यात येते. यावेळी रंगांची उधळण केली जात नाही.

धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. सायंकाळी ठंडाई पिण्यासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात येते. या उत्सवात दुबे, तिवारी, मिश्रा, हजारी, सददीवाल कुटुंबियांकडून चाचरीचा खर्च करण्यात येतो. सणातून एकोप्याची जोपासना करण्यासाठी राजपूत समाजातील होळी मोठा सण समजला जातो. यावेळी भेदभाव विसरून लहान-मोठे सर्वजण सहभागी होतात. शहिदांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो.

प्रशासनाला सहकार्य करणार

कोरोना नियमाचे पालन करून यंदा होळी उत्सव साजरा करणार आहोत. धारूर शहरातील पाच दिवसांचा होळी उत्सव कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करताना प्रशासनास सहकार्य करणार आहोत. त्याचबरोबर उत्सव परपंरा कायम ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी यांनी सांगितले.

चाचरनंतर जावयाची मिरवणूक

चाचर संपल्यानंतर जावयाला शोधून गाढवावर बसवून कटघरात मिरवणूक काढण्यात येते. रंग लावून नंतर सासऱ्याच्या घरी नेऊन नवे कपडे घालतात. दुपारनंतर ज्यांचा रंग असतो त्यांच्या घरी थंडाईचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांना बोलावले जाते. सामाजिक एकतेचा मोठा संदेश देणारा येथील ऐतिहासिक होळी उत्सव शहराच्या वैभवात भर टाकणारा असल्याने परिस्थितीनुरूप हा उत्सव यंदा नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.