शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

बीडमध्ये पोलीस उन्नती दिनानिमित्त फिर्यादींना ८ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 16:50 IST

बीड पोलिसांच्या वतीने विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सार्वजनिक कार्यक्रमातून परत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

बीड : चोरी, घरफोडी, दरोडा, लूटमार यात चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी तपास करुन मिळवला. हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलीस दलाच्या वतीने सन्मानपूर्वक परत करण्यात आला. पोलीस उन्नती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल परत केला. यात दुचाकी, ट्रॅक्टर, दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश होता.

मागील वर्षभरापासून बीड पोलिसांच्या वतीने विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सार्वजनिक कार्यक्रमातून परत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ११ कार्यक्रम घेतले. शुक्रवारी पोलीस उन्नती दिनानिमित्त १२ वा कार्यक्रम घेण्यात आला. ११ पोलीस ठाण्यांमधील घरफोडी, चोरी, लूटमार यासारख्या १९ गुन्ह्यांमधील ८ लाख ६ हजार १५१ रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत केला. यावेळी मुरलीधर रत्नपारखी, प्रल्हाद चौधरी, नारायण भोंडवे, अजय वाघमारे यांनी पोलिसांबद्दलचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कुलबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे, सपोनि शीतलकुमार बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पो. ह. राम यादव, बाबासाहेब डोंगरे, गणेश हंगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सपोनि दिलीप तेजनकर केले. आभार उपअधीक्षक खिरडकर यांनी मानले.

१७३ फिर्यादींना ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल परतआतापर्यंत बीड पोलिसांनी १७१ गुन्ह्यातील १७३ फिर्यादींना तब्बल ७१ लाख ३८ हजार ९३८ रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे. यासाठी संबंधित ठाणे प्रभारी व क्राईम मोहरीर यांचे योगदान सर्वाधिक आहे.

गुन्हे उघड करणे कसरतीचेअनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या हाती कसलाच सुगावा नसतो. यावेळी तपास करणे कसरतीचे ठरते. मात्र, मेहनत, जिद्द व कौशल्याच्या बळावर बीड पोलिसांनी ते सहज शक्य केले आहे. यापुढेही प्रत्येक गुन्हा उघड करुन मुद्देमाल फिर्यादींना परत केला जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांनी सांगितले.

चित्रपटातील पोलिसांशी तुलना नकोचित्रपटातील सिंघम पोलीस वेगळे असतात अन् खरे पोलीस वेगळे आहेत. नागरिकांनी त्यांच्याशी तुलना करु नये. पोलिसांना सहकार्य करा. त्यांच्यावर विश्वास ठेवा. चित्रपटापेक्षाही चांगले काम रस्त्यावर उभा राहून काम करणाऱ्या खऱ्या पोलिसांचे आहे. बोलणे सोपे असते मात्र करणे अवघड असते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपले काम प्रामाणिकपणे पार पाडा. जनतेच्या रक्षणासाठीच आम्ही उभा आहोत. अशा कार्यक्रमांमुळे जनता व पोलीस यांच्यातील सलोख्याचे नाते अधिक घट्ट होईल हाच हेतू आहे. यापुढेही असे कार्यक्रम अखंडितपणे सुरु राहतील, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस