शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांचे खाते उघडण्यास बँकांची टाळाटाळ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

: प्रशासनाने लक्ष देण्याची गरज अंबाजोगाई : राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या वेळकाढू धोरणांमुळे वृद्धांना नाहक त्रास होत आहे. ...

: प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

अंबाजोगाई : राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या वेळकाढू धोरणांमुळे वृद्धांना नाहक त्रास होत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या मंजूर झालेल्या नवीन लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत व इतर बँकांमध्ये खाते काढण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. बँक प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे निराधारांचे नवीन खाते उघडण्याचे काम रखडले आहे.

संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेतून केंद्र व राज्य सरकार, शेतकरी, भूमिहिन, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजार असलेल्या व्यक्तिंना महिन्याकाठी १००० रुपये पगार दिला जातो. अशा लाभार्थींची संख्या अंबाजोगाई तालुक्यात तब्बल २३ हजार १७७ आहे. दर महिन्याला १ कोटी ४० लाख रुपये विविध बँकेत जमा होतात. बँकांच्या चकरा मारून वृद्ध थकतात. परंतु पगार हाती मिळत नाही.

ज्या नवीन लाभार्थींना या विविध योजनांचा लाभ उपलब्ध झाला, अशा लाभार्थ्यांना नवीन खाते काढण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका या नवीन खातेदारांना टोलवाटोलवी करत असल्याने अजूनही त्यांचे खाते निघालेले नाही. याचा मोठा फटका निराधारांना नीमूटपणे सहन करावा लागत आहे. बँकांनी आपल्या ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी. शहरात व ग्रामीण भागात अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्रीयीकृत व इतर बँका सामान्यांना नाहक त्रास देतात, अशी चर्चा खातेदारांमध्ये आहे. उर्मट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून उचित कारवाई करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.

--------

लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक बँकेला निराधारांचे नवीन खाते उघडण्याबाबत कळविले जाईल. ज्या बँका उदासीनता दर्शवतील, अशा बँकांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात येईल.

विपिन पाटील,

तहसीलदार, अंबाजोगाई.

--------

महिन्याकाठी ज्यांचे जगणे पगाराच्या भरवशावर आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हाताने काम होत नाही. सरकारकडून मिळणारा आधार तोही बँकांच्या हलगर्जीपणामुळे वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कित्येक वृद्ध निराशेच्या खाईत ढकलले जात आहेत.

-----------