शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनाला वर्ष उलटले तरी कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST

कडा : उद्घाटनाला वर्ष उलटले तरी जागेच्या वादामुळे कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने महिला, मुली व प्रवाशांची मोठ्या ...

कडा : उद्घाटनाला वर्ष उलटले तरी जागेच्या वादामुळे कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने महिला, मुली व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचबंणा होत आहे.

मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार व दिवसभरात दोनशेहुन अधिक बसेसची ये जा असलेल्या कडा बसस्थानकाला उतरती कळा आली होती. आणि सोयीसुविधा नसल्याने नवीन बसस्थानक व्हावे जनतेची मागणी होती. हा प्रश्न मार्गी लागला मंजुरी मिळाली. उद्घाटन झाले, एक कोटी चाळीस लाख रूपये खर्चाला कार्यारंभ आदेश मिळाला. जागेचे मार्कआऊट केले. पण नेमकी जागा ग्रामपंचायती की राज्य परिवहन महामंडळाची हा वाद मिटत नसल्याने वर्ष उलटून गेले तरी कामाला मुहूर्त अद्याप लागलेला नाही.

आष्टी तालुक्यातील कडा येथे बीड नगर राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानक आहे. अनेक वर्षांपासून बसस्थानक असल्याने आता ती जागा अपुरी पडत असून सोयीसुविधा मिळत नसल्याने जनतेच्या रेट्यामुळे २०१८ मध्ये नवीन बसस्थानक मंजूर झाले. २०१९ ला उद्घाटन झाले. पण तेव्हापासून ग्रामपंचायत व एस. टी. महामंडळात जागा कोणाचा असा वाद सुरू झाला. ग्रामपंचायत व महामंडळ दोघेही आमचीच जागा असल्याचा दावा करत असल्याने ती जागा नेमकं कोणाची हे अजुनही समजले नाही. त्यामुळे जवळपास दीड कोटी रूपये खर्चून शहरांच्या वैभवात भर घालणाऱ्या या नियोजित बसस्थानकाच्या कामाला आडकाठी निर्माण झाली आहे. सध्या या ठिकाणी कसलीच सोय नाही. प्रवाशांना उघड्यावरच नैसर्गिक बसत असल्याने मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. शहराच्या वैभवात भर पडत असेल तर लवकरात लवकर जागेचा वाद मिटवुन बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

याबाबत आष्टी येथील आगार प्रमुख संतोष डोके यांना विचारणा केली असता कडा बसस्थानकाच्या जागेचा वाद सुरू असल्याने बसस्थानकाचे काम बंद असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तर जागेच्या वादाचा विषयच येत नाही. महामंडळाने त्यांना ठरवून दिलेल्या ६१ गुंठा जागेत बसस्थानकाचे काम सुरू करावे असे कडा येथील ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे म्हणाले.