शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर ९९.९६ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात ...

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात ४० हजार ५३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बीड जिल्हा विभागात संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर राहिला. दरम्यान, दुपारी एक वाजेपासून निकाल दर्शविणाऱ्या बोर्डाच्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने उत्सुकता लागलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले. बीड जिल्ह्यातून ४० हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाती. त्यापैकी ४० हजार ५३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २५ हजार ८३२ विद्यार्थी विशष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ग्रेड १ मध्ये १३ हजार ५६१, ग्रेड २ मध्ये ११११, १८ विद्यार्थी ग्रेड पास, तर एकूण ४० हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे.

----------

तालुकानिहाय निकाल प्रविष्ट विशेष प्रावीण्य एकूण उत्तीर्ण निकाल

धारूर १०३४ ०६५७ १०३३

परळी ४२७९ २३७४ ४२७८ ९९.९७

केज ४१७१ ३१४० ४१६८ ९९.९२

अंबाजोगाई ४४७० २६७२ ४४६९ ९९.९७

माजलगाव ३५९९ १७९६ ३५९५ ९९.८८

गेवराई ४४९९ २६२९ ४४९८ ९९.९७

वडवणी १५७९ १०६५ १५७९ १००.००

शिरूर १८२१ १२२७ १८२१ १००.००

आष्टी ३९४३ २५३३ ३९४३ १००.००

पाटोदा १८२३ १२७३ १८२३ १००.००

बीड ९३१७ ६४६६ ९३१५ ९९.९७

----------

६५९ शाळांचा निकाल १०० टक्के

जिल्ह्यातील ६५९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यंदा हा आकडा विक्रमी आहे. १३ शाळांचा निकाल पेक्षा कमी आहे. नोव्हेंबरमध्ये चार महिने प्रत्यक्ष वर्ग भरले. या कालावधीत ६० टक्के अभ्यास मुलांकडून करून घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे परीक्षा न होता नववीचे ५० टक्के व दहावीचे ५० टक्के गुणांवर मूल्यमापन करण्यात आले. नववीत मिळालेल्या कमी गुणांचा फटका मात्र अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे.

--------

निकालाच्या वेळीच लाईन ऑफ

कोरोनामुळे परीक्षा रद्द करून मूल्यांकन करण्यात आले. तरीही निकालाची विद्यार्थी व पालकांना उत्सुकता होती. परंतु शुक्रवारी निकाल जाहीर होताच संगणक, माेबाईलद्वारे सर्च करताना अनंत अडचणी आल्या. आधी वर्ग भरले नाही, नंतर भरले तर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे परीक्षा देता आली नाही. निकालाच्या वेळी सर्व्हर डाऊनमुळे लाईन ऑफ झाल्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा आनंद हिरावला.

---------

मुले का अनुत्तीर्ण झाली?

खरे तर यंदा दहावीचा निकाल १०० टक्केच लागायला हवा होता. नववीतील ५० टक्के गुण, दहावीचे अंतर्गत मूल्यमापनासह एकूण ५० गुण या आधारे झालेल्या निकालामुळे गळती होण्याचे काहीच कारण नाही; तरीही १३ मुले अनुत्तीर्ण का झाली, याचा शोध घ्यावा लागणार आहे.