शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

आष्टी : एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब असून, एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन वारसांच्या नावे घेण्यात यावी, अशी ...

आष्टी : एकत्रिकरणामधील पतीच्या नावावरील ७ एकर क्षेत्र गायब असून, एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन वारसांच्या नावे घेण्यात यावी, अशी मागणी सुजानाबाई उत्तम जरे व उषा चंद्रकांत नांगरे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुजानाबाई जरे या उत्तम विठोबा जरे यांची पत्नी, तर उषा नांगरे ही मुलगी आहे. त्यांना मौजे मातकुळी येथे जुना सर्व्हे नं. १३२ / अ व नवीन सर्व्हे नं. ८२९मध्ये एकूण ८ एकर १२ गुंठे शेतजमीन आहे. ही शेतजमीन ते अद्यापपर्यंत वहिवाट करीत असून, त्यातील पिकांचा उपभोग घेत आहेत. या जमिनीचे मूळ मालक अर्जदार जरे यांचे सावत्र चुलत सासरे रंगनाथ जरे हे अर्जदार नांगरे यांचे आजोबा होते. त्यांना कोणीही अपत्य नसल्यामुळे ते मयत झाल्यानंतर वरील सर्व जमीन आमच्या ताब्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. १९९०मध्ये जमीन एकत्रिकरणामध्ये ताब्यातील ८ एकर १२ गुंठे जमिनीपैकी अर्जदाराचा मुलगा देविदास उत्तम जरे यांच्या नावे २३ आर. जमीन व माझी सून संगीता देविदास जरे हिच्या नावे २० आर. जमीन आलेली आहे. तसेच उर्वरित जमीन ही भावकीतील दिलीप महादेव जरे, नवनाथ महादेव जरे, सतीश सदाशिव जरे, गणेश सदाशिव जरे, धनंजय सदाशिव जरे यांच्या नावे ४ एकर जमीन आणि अनिल विठोबा जरे, भीमराव विठोबा जरे व शामराव विठोबा जरे यांचा मुलगा रंगनाथ उर्फ प्रकाश शामराव जरे यांच्या नावे ३ एकर जमीन एकत्रिकरणामध्ये गेली आहे. परंतु या जमिनीवर अद्यापपर्यंत आपला ताबा असून, वहिती करून खात असल्याचे सुजानाबाई जरे व उषा नांगरे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच फेर नं. १८४२ अन्वये सर्व्हे नं. ८२९मध्ये चुकीने विहिरीची नोंद झाली होती ती विहीर ८३१मध्ये होती. हा फेरफार रद्द करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, पाटोदा यांच्याकडे अपील दाखल केलेले असून, अपिलाची कारवाई सुरू आहे. एकत्रिकरणामध्ये गेलेली जमीन आपल्या नावे करावी म्हणून जरे व नांगरे यांनी वेळोवेळी आष्टी तहसील कार्यालय, मंडल अधिकारी व जिल्हाधिऱ्यांकडे अर्ज केलेले आहेत. परंतु त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे एकत्रिकरणामध्ये गेलेली आमची जमीन वारसांच्या नावे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे. मात्र, सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव अर्जदारांना येत आहे.