शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तपोवनातील मुलींना हलविणार ?

By admin | Updated: December 23, 2014 22:55 IST

तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या १२२ अनराधार, अनाथ मुलींच्या आयुष्याला तेथे गंभीर धोका असल्याच्या दिशेने बाल कल्याण समितीचे मंथन सुरू झाले आहे. समितीच्या बहुतांश

मंथन : मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बालकल्याण समिती गंभीर, निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब !
अमरावती : तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या १२२ अनराधार, अनाथ मुलींच्या आयुष्याला तेथे गंभीर धोका असल्याच्या दिशेने बाल कल्याण समितीचे मंथन सुरू झाले आहे. समितीच्या बहुतांश सदस्यांनी या विचाराला अनुकूलता दर्शविल्यामुळे सर्वच मुलामुलींना तपोवनातून हलहवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या बालगृहांमध्ये पटावर १२२ मुली आणि ६७ मुले वास्तव्यास आहेत. जी मुले वयाच्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत आणि ज्यांचे पालकत्त्व स्वीकारायला कूणी तयार नाही अशा मुला मुलींना बालगृहात प्रवेश दिला जातो. केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन कायद्यांतर्गत या मुला-मुलींचे तेथे निकोपणे संगोपन केले जाते. त्यांच्या मानसिक वाढीची विशेषत्त्वाने काळजी घेतली जाते. त्यांच्या देखरेखीची आणि सुरक्षेची जबाबदारी वसतीगृहाची असते. सर्व कारभार नियमसंगरित्या सुरू आहे की नाही हे बघण्यासाठी बालकल्याण समितीची नियुक्ती केली जाते. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारऱ्याच्या श्रेणीचे अधिकार बहाल असलेल्या या समितीच्या आदेशाला वसतीगृह बाध्य असते.
तपोवनच्याा बालगृहात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची एकएमागून एक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर बाल कल्याण समिती सक्रीय झाली आहे. इतके सगळे घडून गेले नि बालकल्याय समिती अनभिज्ञ राहिली याची बोचही समितीला आहेच. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात मुलींच्या आयुष्याशी खेळ होऊ नये यासाठी बालकल्याण समितीने विचारमंथन सुरू केले आहे. तपोवनमध्ये घडलेल्या प्रकारांची यादी बघता हे स्था मुलींसाठी मुहीच सुरक्षित नाही, अशा प्रथमिक निष्कर्षाप्रत समिती आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामेर्तब व्हायचे असले तरी लवकरच हा निर्णरु अुमलात आणण्याची शक्यता आहे. असा निर्णय झाल्या तपोवनातील सर्व मुली इतर बालगृहांमध्ये हलविल्या जातील. मुली हलपिल्यास मुलेही हलविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपोवनच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्याच्या दिशेने सुरू झालेला हा विचार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. ज्याच्या शिरावर मुलामुलींच्या संगोपनाची, देखरेखीची आणि सुरक्षेची जबाबदारी होती त्या अधीक्षक गजानन चुटे यानेच मुलींवरील अत्याचाराला बळ दिले, अशी खात्री पअल्याने पोलीसांनी त्याला अटक केली होती. मुलींचे लगिक शोषण करणाऱ्यांमध्ये तपोवनातील कर्मचारी सहभागी असल्यामुळे मुली कुणाच्या भरवशावर ठेवायचा असा मोठा प्रश्न समितीला पडला आहे. मुलांचे शोषण झाले असल्याची एकही तक्रार अद्याप पुढे आली नसली तरी अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार पडतील याचीही काळजी बाल कल्याण समितीला वाहायची आहे. समितीचा कारभार निकोप आएि पारदर्शी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आता समितीने कठोर निर्णरु घेणेदेखील आवश्यक ठरते. निर्णयबाबत जाणून घेण्यासाठी समितीेचे अध्यक्ष दिलीप काळे यांना संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)