शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

शेतकऱ्यांची थट्टा होत असताना पालकमंत्री गप्प का? - यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:32 PM

आमदार ॲड. यशोमती ठाकूर पीक विम्याच्या मुद्यावर भडकल्या

अमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांची शासनाने थट्टा चालवली आहे. पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या मुद्यावरून विदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. असे असताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गप्प का, असा सवाल काँग्रेस आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

अमरावती येथे पीकविम्याच्या मुद्यावर ‘सरकारनामा’शी गुरुवारी त्यांनी संवाद साधला. विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शासन भेद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मस्करी करणे लावली आहे. आपण या मुद्यावर विधिमंडळात आवाज उठविणार आहोत. त्यासाठी आधीच आपण प्रश्न दाखल केलाय. बीड जिल्ह्यामध्ये पीकविमा कंपनी २४१ कोटी रुपये देत आहे. बीडमध्ये शेतकरी राहतात, मग अमरावती जिल्ह्यात काय जनावरे राहतात काय, असा संतप्त सवालही आमदार ॲड. ठाकूर यांनी केला. अमरावती जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांसाठी फक्त आठ लाख देण्यात आले आहेत, असे त्या म्हणाल्या.

पीक विम्याची ही रक्कम देत असताना अमरावतीचे पालकमंत्री आता गप्प का आहेत असे नमूद करीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. शासन शेतकऱ्यांच्या मुद्यावर अजिबात गंभीर नाही. शासनाने शेतकऱ्यांना गृहीत धरणे बंद न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी वेगळा, मराठवाड्यातील वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळा असा भेद आतापर्यंत कुणीही केला नव्हता. परंतु, सध्याचं शासन असा भेद करताना दिसतेय, असा आरोपही ॲड. आमदार ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणYashomati Thakurयशोमती ठाकूरFarmerशेतकरीchandrakant patilचंद्रकांत पाटील