शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना खचलेल्या विहिरींचे अनुदान केव्हा?

By admin | Updated: December 27, 2014 22:43 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा जनुना येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांच्या शेतातील विहीर पूर्ण खचली आहे. यासंदर्भात जावराच्या तलाठ्यांना

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा जनुना येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांच्या शेतातील विहीर पूर्ण खचली आहे. यासंदर्भात जावराच्या तलाठ्यांना अर्ज देऊनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ओलित ठप्प असल्याने आर्थिक सकंट ओढावले आहे. न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे विनंती केली आहे.
जावरा जनुना येथील अल्प भूधारक शेतकरी चंद्रकांत खंडार व रघुनाथ खंडार यांचे मौजा जावरा जनुना येथे सर्वे नं. ५२/२,५१ च्या शेतात विहीर आहे. मात्र सन २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या ही विहीर खचली. त्यामुळे ओलित थांबले आहे. या संदर्भात शेतकऱ्याने १० सप्टेंबर २०१३ रोजी तलाठी जावरा यांच्याकडे अर्ज दाखल केला. मात्र तलाठी यांनी हेतुपुरस्सर अर्ज नामंजूर केल्याचा आरोप खंडार यांनी केला आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने ३१ जुलै २०१४ रोजी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा तहसीलदार यांच्या आदेशान्वे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी स्थळाला भेट देऊन निरीक्षण केले. परंतु त्यानंतरही तलाठ्याने विहीर केव्हा खचली याबाबत शेतकऱ्यांनाच उलटसुलट प्रश्न विचारणे सुरु केले. शेतकऱ्यांना माहिती नाही, असे अहवालात नमूद करुन आमच्यावर अन्याय केला, असा आरोप रघुनाथ खंडार व चंद्रकांत खडार यांनी केला आहे. आम्हाला हेतुपुरस्सर डावलले गेले असून खचलेल्या विहीर अनुदानापासून आम्ही वंचित झाल्यामुळे आता विहीर कशी उपसावी व ओलित कसे करावे, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. याउलट जावरा येथीलच शर्मा नामक शेतकऱ्याची विहीरसुध्दा अतिवृष्टीत खचली होती. मात्र ती विहीर तलाठी यांनी मंजूर केली आहे. असा भेदभाव का, असा सवाल सदर वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात न्याय मागण्यासाठी आता जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये घडलेला सर्व प्रकार नमूद करण्यात आला आहे. आमच्या अर्जाचा फेरविचार करुन खचलेल्या विहिरीचे पुन्हा सर्वेक्षण करुन दोषीवर कारवाई करावी तसेच आम्हाला शासनाकडून खचलेल्या विहिरीचे दुरुस्ती अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.