शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:13 IST

रक्ताचे नातेही गोठले? अंत्यसंस्कारानंतर अनेक नातेवाईक फिरकतही नाहीत अमरावती : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या गोळा केलेल्या अस्थी, राख अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक ...

रक्ताचे नातेही गोठले? अंत्यसंस्कारानंतर अनेक नातेवाईक फिरकतही नाहीत

अमरावती : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या गोळा केलेल्या अस्थी, राख अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक स्मशानातून घेऊन जातात. परंतु, असेही काही आहेत, जे स्मशानाकडे फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे शहरातील विविध हिंदू स्मशानभूमीचे अथवा महापालिका कर्मचारीच ही राख एकत्रित करून विसर्जित करतात. परंतु, सध्या नद्याही आटल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. अशावेळी कृत्रिम विसर्जनस्थळी अस्थी विसर्जित करीत असल्याची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तीव्र स्वरुपाची आहे. दिवसाकाठी ८०० ते ९०० कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे मृत्युमुखी पडणाऱ्यांचाही संख्या कमी नाही. कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींवर महापालिकेच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महिनाभरापूर्वी दरदिवशी २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. सध्या हा आकडा १५ ते १८ पर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, अंत्यविधीनंतर गोळा केलेली राख घेऊन जाण्याचे सौजन्यही काही आप्त दाखवित नाहीत. स्मशानाकडे फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे राखेचे करायचे काय, असा प्रश्न कायम महापालिका, हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

पावसाळ्यात नद्या प्रवाही असल्याने चार-पाच दिवसांची राख एकत्रित करून ती पात्रात सोडून दिली जात होती. परंतु, आजघडीला नद्या कोरड्या झाल्याने त्यात राख सोडणे कठीण झाले आहे. आठ ते दहा दिवसाआड एखाद्या नदीच्या पाण्यात ती सोडून दिली जात आहे. स्मशानातच एका कोपऱ्यात साठवून ठेवल्या जाणाऱ्या राखेच्या मडक्यांची संख्या पाहून कोरोनाच्या भीतीने रक्ताचे नातेही गोठले की काय, असा प्रश्न पडल्याखेरीज राहणार नाही.

----------------

बॉक्स

अस्थींच्या विसर्जनाचाही प्रश्न?

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाहेर फिरण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण स्मशानातून अस्थी घेऊन जात नाहीत. त्यामुळे संबंधित अस्थींचे करायचे काय, असा प्रश्न हिंदू स्मशानभूमी, महापालिका कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

बॉक्स

सार्वजनिक स्मशानभूमी एसआरपीएफ

अमरावती शहरातील शासकीय तसेच खासगी दवाखान्यांत दगावलेल्या कोरोना रुग्णांवर एसआरपीएफ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महिनाभरापूर्वी एकेका दिवशी २० ते २५ मृतदेहांवर अंंत्यसंस्कार करण्यात येत होते. सध्या ते प्रमाण १५ ते १८ पर्यंत खाली आले आहे. जे नातेवाईक राख घेऊन जात नाही, ती स्मशानात साठवून ठेवली जात आहे. नदीचे पाणी आटल्यामुळे सध्या दहा ते बारा दिवसांची राख स्मशानात शिल्लक आहे.

बॉक्स

सार्वजनिक स्मशानभूमी, विलासनगर

शहरात कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींवर येथील विलासनगर आणि शंकरनगरातील सार्वजनिक स्मशानभूमींमध्ये महापालिकेच्या पथकाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. ५० टक्के नातेवाईक राख तसेच अस्थी घेऊन जातात. परंतु, उर्वरित लोक राख नेत नाहीत. त्यामुळे ही राख स्मशानातील एका कोपऱ्यात साठवून ठेवली जाते. यानंतर ती ओढा अथवा नदीच्या पाण्यात सोडून देण्यात येते.

बॉक्स

सार्वजनिक हिंदू स्मशानभूमी

अमरावती शहरामध्ये दगावलेल्या कोरोनाबाधितांवर महापालिकेकडून सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारानंतर संबंधित नातेवाइकाना राख तसेच अस्थि घेऊन जाण्याबाबत कळविले जाते. यानंतरही काही नातेवाईक राख घेऊन जात नाहीत. अशी राख येथील हिंदू स्मशानभूमीत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जात आहे. दुसऱ्या लाटेत दगावलेल्यांची, नातेवाइकांनी न नेलेली राख स्मशानभूमीत शिल्लक आहे.

कोट

काय म्हणतात स्मशानजोगी....

अंत्यसंस्कारानंतर जे नातेवाईक राख घेऊन जात नाहीत, ती स्मशानातच साठवून ठेवली जाते. सध्या नदीला पाणी नाही. त्यामुळे राखेचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजघडीला १०० ते १५० जणांच्या अस्थी साठल्या आहेत.

-एक कर्मचारी, हिंदू स्मशानभूमी, अमरावती

अंत्यसंस्कारानंतर नातेवाइकांना राख तसेच अस्थी घेऊन जाण्यास सांगितले जाते. अनेक जण नेत नाहीत. त्यामुळे अशी राख स्मशानातच साठवून ठेवली आहे.

- एक कर्मचारी, महापालिका

५० टक्के नातेवाईक राख घेऊन जात नाहीत. अशी राख आम्ही साठवून ठेवतो. बऱ्यापैकी साठवल्यानंतर ती कृत्रिम विसर्जनस्थळी अथवा नदीमध्ये सोडून देतो. आजघडीला पाच-सहा दिवसांची राख शिल्लक आहे.

- एक कर्मचारी, हिंदू स्मशानभूमी