शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

तिवसा तालुक्यात मिळणार अप्पर वर्धाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:47 AM

भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून मागणीची दखल

तिवसा : भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.पाणीटंचाई अधिक गडद झाल्याने अप्पर वर्धा नदीचे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी व धरण विभागाला केली होती. त्याची दखल घेत वर्धा नदीच्या पात्रात रविवारपासून दोन दिवस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.यावर्षी पावसाळा कमी झाल्याने व पाण्याची पातळी खाली गेल्याने अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अप्पर वर्धा धरणाला पाणी सोडण्यात येणार असल्याने मोर्शी, तिवसा व धामनगाव रेल्वे या तालुक्याला याचा फायदा होणार आहे. अप्पर वर्धा धरणात आजघडीला १६.७९ टक्केच पाणीसाठा ुशिल्लक आहे. मागील वर्षी तो पाणीसाठा ३७ टक्के होता. दरम्यान, अप्पर वर्धामध्येच मर्यादित पाणीसाठा असल्याने दोन दिवस नदीपात्रात सोडले जाणारे पाणी अल्पच असेल, असा अनेकांचा होरा आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यास मोझरी व तिवसा पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ होणार असल्याची बाब आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली.धामणगाव तालुक्याच्या २९ गावांना दिलासाधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यातील २९ गावांना दिलासा मिळणार आहे. बगाजी सागर धरणात अल्प पाणी साठा असल्याने शहरातील पंचवीस हजार नागरिकांना दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्याची पाळी नगर परिषदेवर आली होती. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे अप्पर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.गरज भासल्यास आणखी पाणीअमरावती : मुख्यमंत्र्यांकडे ६ मे रोजी नागपूर येथे भाजपाच्यावतीने मागणी केल्यानुसार अप्पर वर्धा धरणातून १२ मे रोजी रात्री १२ वाजता नदीपात्रात १० घनमीटर पाणी सोडले जाईल. यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी उपलब्ध होण्यास मदत व नागरिकांना, गुरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. राज्य सरकार दुष्काळी उपाययोजना राबविण्यास तत्पर असून, गरज भासल्यास आणखी पाणी धरणातून सोडले जाण्याची माहिती भाजप नेत्या निवेदिता दिघडे चौधरी यांनी दिली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई