शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

आयुक्तांना घेराव, ६६ गावात पोहोचणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:21 IST

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडलेले पाणी गावांमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखण्याच्या खेळीनंतर यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. त्यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधित यंत्रणेला दिला.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाला यश : रात्री ७.३० वाजता निर्णय; कलेक्टर, सीईओ उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडलेले पाणी गावांमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखण्याच्या खेळीनंतर यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. त्यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधित यंत्रणेला दिला. आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला.दुपारी ३ वाजता यशोमती ठाकूर १३ गावांतील गावकऱ्यांसह विभागीय आयुक्तालयात दाखल झाल्या. आयुक्तांसमोर पाण्यासाठी प्रभावी मागणी नोंदविली गेली. पाणी मिळेपर्यंत आम्ही हलणार नाही, हलू देणार नाही, असा पवित्रा आमदार ठाकूर यांनी घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी सायंकाळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, सिंचन खात्याचे कार्यकारी अभियंता, संबंधित बीडीओ, वीज अधिकारी, अशी संबंधित यंत्रणा पाचारण केली. पाणीपुरवठ्यात अडथळा ठरणाºया सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी समोरासमोर सोडविण्यासाठीचे आदेश देऊन त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा आदेश दिला. या आदेशानुसार, शक्य असेल तेथे नदीपत्रातून, नसेल तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.या गावांना होणार पाणीपुरवठामोर्शी तालुका : तुळजापूर, निंभार्णी, शिरूळ, पिंपळखुटा, भांबोरा, येवती, कवठाळ, शिरलस, लेहगाव, लिहिदा, शिरखेड, नया वाठोडा, सावरखेड, काटपूर, नेरपिंगळाई, वाघोली, लेहगाव, राजूरवाडी.तिवसा तालुका : दापोरी, वरूडा, करजगाव, जावरा, फत्तेपूर, सातरगाव, इसापूर, काटपूर, नमस्कारी, वणी, ममदापूर, वरखेड, तारखेड, भारवाडी नवी, भारवाडी जुनी, ठाणाठुणी, आखतवाडा, धामंत्री, कौंडण्यपूर, कुºहा, उंबरखेड, निंभोरा, देलवाडी, डेहणी, तिवसा, गुरुदेवनगर, मोझरी, तळेगाव ठाकूर, मसदी, सुरवाडी, अनकवाडी, शिदवाडी, मार्डा, बोर्डा, जहागीरपूर, वºहा, चेनुष्टा, घोटा.अमरावती तालुका : डिगरगव्हाण, जळका शहापूर, शेवती जहागीर, गोपाळपूर, सालोरा, देवरा शहीद, देवरा पुनर्वसन, माहुली जहागीर, नांदुरा.पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन खात्याचाचऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन अधिकाºयांनीच घेतला. त्यासाठीची आवश्यक प्रक्रियाही पूर्ण केली गेली. पाणी किती सोडायचे, हेदेखील संबंधित अधिकाºयांनीच ठरविले, अशी माहिती सिंचन खात्याच्या कार्यकारी अभियंत्याने सभागृहात दिली. पाणी सोडण्याचा निर्णय कुणाचा होता, या आमदार यशोमती यांच्या प्रश्नावर ही माहिती दिली गेली.पीयूष सिंह म्हणाले, प्रॉमिस !पाणी पुरविण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी रात्री दिला. पुन्हा त्यात अडचण तर येणार नाही ना, याबाबत यशोमती ठाकूर खातरजमा करून घेत होत्या. विभागीय आयुक्त म्हणाले, तसे घडणार नाही. यशोमती ठाकूर त्यांना म्हणाल्या, प्रॉमिस? त्यावर पीयूष सिंह उत्तरले - प्रॉमिस!पुसदा, आमला,डिगरगव्हाणचे मुद्दे निकालीपुसदा येथील किरकोळ दुरुस्त्या त्वरित करा, डिगरगव्हाणचे बुडातून गंजलेले विजेचे खांब चार दिवसांत बदलवा, आमला येथील अपूर्ण पाइप लाइनच्या कामासंबंधीचे प्रशासकीय कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण करा, असे आदेश पीयूष सिंह यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना दिले. आमदार यशोमती यांनी या तिन्ही गावांतील मुद्दे गावकºयांना सादर करण्यास सांगितले होते.पाणी वितरणाच्याबैठकीचे बोलावणे नाहीपाणी वितरणाची बैठक कोण घेते, ती कधी होते, असे प्रश्न आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकाºयांना केले. बैठक होत असून, आमदारांनाही त्यात बोलविले जाते, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले. परंतु, अशा कुठल्याही बैठकीत पाच वर्षांत मला कधीच बोलविले गेले नाही, असा मुद्दा ठाकूर यांनी मांडला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई