शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील गावे ३६ वर्षांपासून उपेक्षित

By admin | Updated: October 17, 2015 00:10 IST

तालुक्यातील नदी काठावरील गावे मागील ३६ वर्षांपासून उपेक्षित असून येथील ग्रामस्थ नशिबाला दोष देत जीवन जगत आहेत.

शासनाने राबवाव्यात कायमस्वरूपी उपाययोजना : दररोज असुरक्षिततेत काढतात दिवसधामणगाव रेल्वे : तालुक्यातील नदी काठावरील गावे मागील ३६ वर्षांपासून उपेक्षित असून येथील ग्रामस्थ नशिबाला दोष देत जीवन जगत आहेत.लालफितशाहीच्या चक्रव्युहात अडकलेल्या या गावांमध्ये विकासाची पहाट कधी उजाडणार, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. इतर धरणग्रस्त गावांना मदत, तर मग आम्हीच वाऱ्यावर का, हा सवाल या गावातील अन्यायग्रस्तांनी केला आहे़सन १९७९ मध्ये महापूर आला होता़ यामुळे उद्ध्वस्त झालेल्या तालुक्यातील चार गावांचे पुनर्वसन झाले होते़या गावातील ग्रामस्थ अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. पुराचा सर्वाधिक फटका धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज, बोरगाव-धांदे, बोरगाव निस्ताने, विटाळा या चार गावांना बसला होता. वर्धा व चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे ही गावे उद्ध्वस्त झाली होती़ त्यात चार जणांचा मृत्यू व कोट्यवधी रूपयांची हानी झाली होती. तत्कालीन पुनर्वसनमंत्री शरद पवार यांनी १९८३ मध्ये या पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती़ तद्नंतर या चारही गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ परंतु मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत.तालुक्यातून वर्धा, चंद्रभागा, खोलाड, विदर्भ, मोती कोळसा, अशा नद्या तर कोल्हा, बेडकी यांसह ३२ मोठे नाले वाहतात़ या नाल्यांच्या काठी ग्रामस्थांचे वास्तव्य आहे़ निंभोरा राज, दत्तापूर, कळाशी, भिल्ली, सोनेगाव खर्डा, भातकुली बोरगाव धांदे, विटाळा यांना गावांना पुराचा फटका बसतो.प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात मग्नधामणगाव तालुक्यातील निंभोरा राज हे पूरग्रस्त पुनर्वसित गाव विकासापासून कोसो दूर आहे़ येथे रस्ते नाल्या नाहीत. बाजार ओटेदेखील नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही़ दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ रात्र काढतात. चंद्रभागा नदीला रात्री पूर आल्यास कधीही पुराचे पाणी घरात शिरून धान्य ओले होऊन दुसऱ्या दिवशी दोन वेळचे अन्नही या पुनर्वसिताना मिळत नाही़ दरवर्षी शेतजमीन खरडून जाते. शासनदरबारी हेलपाटे घेऊनही योग्य तो मोबदला मिळत नाही़ सार्वजनिक भवन, व्यापारी संकु ल या गावात नाही़ शाळेला संरक्षण भिंत नाही. ग्रामपंचायत भवनाची इमारत कधी तयार होणार, असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामपंचायतीने वारंवार विकासासंदर्भात ठराव घेऊन ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेला सादर केलेत. परंतु कागदीघोडे नाचविण्याखेरीज अन्य कोणताही विकासाचा पर्याय काढला जात नाही़ हीच अवस्था इतर पूरग्रस्त पुनर्वसितांची झाली आहे़१६ बाय ९० चौरस फुटांच्या घरात संसारपूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ जून १९८७ साली सोळा बाय नव्वद चौरस फूट आकारातील घराचे बांधकाम करण्याकरिता तर शेतमजुरांना ३० बाय ९० स्केअर फूट प्लॉट देण्यात आले़ आज या गावातील ग्रामस्थांसाठी केवळ निवासाची व्यवस्था आहे़ परंतु शासनाने त्यावेळी कबूल केल्याप्रमाणे १७ नागरी सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. या पुनर्वसित वस्त्यांमध्ये नागरी सुविधा पुरविल्या गेल्या असत्या तर या गावांचा चेहरा-मोहरा बदलला असता़ परंतु लालफितशाहीमुळे या बाबीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी या पुनर्वसित वस्त्यांमधील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या सुविधा या गावांमध्ये मिळालेल्या नाहीत. धामणगाव तालुक्यात वर्धा, चंद्रभागा, खोलाड, विदर्भ, मोती कोळसा या नद्या तर कोल्हा, बेडकी यांसह ३२ मोठे नाले आहेत़ निंभोरा राज, दत्तापूर, कळाशी, भिल्ली, सोनेगाव खर्डा, भातकुली, बोरगाव धांदे, विटाळा तसेच वर्धा नदीच्या काठावरील गावे अस्त्विाची लढाई लढत आहेत. दरवर्षी नुकसानीचे प्रमाण अधिक व मदत अल्पच मिळत असल्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाविरूध्द नाराजी व्यक्त केली आहे़ आता नव्या शासनाकडून तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे़ आतापर्यंत न्याय न मिळाल्याने येथील नागरिक कसेबसे जीवन जगत आहेत. आता मात्र, मदत तातडीने मिळावी, अशी अपेक्षा आहे. - सुधाकर पांडे, सरपंच, निंभोरा राज.