शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

वरुड तालुक्यात मुसळधार

By admin | Updated: June 24, 2015 00:34 IST

गत २४ तासांपासून वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.

२४ तास बरसला : जमीन खरडली, पेरणी खोळंबली, पाणी घरात शिरले, वाहतूक विस्कळीतवरूड : गत २४ तासांपासून वरुड तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेकडो हेक्टर जमीन पुरात खरडून गेली असूून बियाणे आणि खतेही वाहून गेलेत. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ४८.५३ मी.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील प्रकल्पात ४० टक्के जलसाठा आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात २१ जूनपासून संततधार पावसाला झाली. सात महसूली मंडळामध्ये वरुड ४३ मि.मी., बेनोडा ५० मि.मी., लोणी ९०.८० मि.मी., राजूराबाजार ४६.६० मि.मी., वाठोडा चांदस ५१.३० मि.मी., पुसला ३२ मि.मी., शेंदूरजनाघाट २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २२ जूनला केवळ ५३.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी २२ जूनला १७७.४५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. काही शेतकऱ्यांनी पेरणीसुध्दा केली होती. पावसामुळे शेतात जाण्याचे मार्गही बंद झाले आहे. नदी-नाले एकरुप होऊन वाहू लागले आहेत.सावंगीत रेल्वे पुलाखाली पाणीसावंगी : सावंगी ते पुसला मार्गावर सावंगीहून १ किलामीटर अंतरावर अंतरावर नरखेड ते न्यू अमरावती हा रेल्वे मार्ग जातो. या रेल्वेमार्गावर सावंगीला ये-जा करण्यासाठी पूल उभारण्यात आला. परंतु त्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे पावसाचे पाणी त्या पुलाखाली साचून राहते. दरवर्षी पावसाळयात याठिकाणी पुराचे स्वरुप येत असल्याने वाहनचालकासह शेतकऱ्यांनासुध्दा मोठा त्रास सहन करावा लागतो.पेठ मांगरुळीत पाणी शिरले पेठ मांगरुळी : परिसरात पहिल्यांदा ५० वर्षात सततधार पावसाने कहर केलाअसून शेकडो हेक्टर शेतजमिनी खरडून नेल्या तर शेताचे बांध फुटल्याने शेतात पाण्याचे चर पडले. पेरणी सुरु असताना अनेकांचे पेरणीचे साहित्यसुध्दा वाहून गेले. गावातसुध्दा सावंगा नाल्याचे पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी तुंबले होते. सततधार पावसामुळे अनेककाच्ंया पेरण्या रखडल्या. शेतात पाणी घुसल्याने शेतातील बांध फुटले, नुकतेच पेरणी झालेले शेत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहेत.झोलंबा येथील जमीन अतिवृष्टीत खरडली !झोंलबा : शेतशिवारामध्ये अतिवृष्टी झाल्याने नाल्याला आलेल्या आणि नालाखोलीकरणामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेले पी.व्ही.सी. पाईप आणि ठिबकच्या नळ्यासुध्दा वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी नुकतेच तहसीलदार यांना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आहे. झोलंबा येथे हिवरखेडच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत.