शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

हलाखीच्या परिस्थितीतून झाले उमेश न्यायाधीश

By admin | Updated: March 14, 2016 00:12 IST

परिस्थिती हलाखीची असताना सर्व समस्यांवर मात करून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या उमेश भास्कर पेठे ...

मुलाखत : गुरुजनांचे मार्गदर्शन सार्थकसंदीप मानकर अमरावतीपरिस्थिती हलाखीची असताना सर्व समस्यांवर मात करून शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या उमेश भास्कर पेठे या विद्यार्थ्याने न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर ही परीक्षा उत्तीर्ण करून गरूडझेप घेतली आहे. उमेश यांनी येथील डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबीची डिग्री प्राप्त केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी या परीक्षेचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाला असून उमेश पेठे हे या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील तोंगलापूर या १२० लोकसंख्येच्या गावात अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात उमेशचा जन्म झाला. त्याचा मोठा भाऊ पोलीस म्हणून कार्यरत आहे. उमेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पिंपळखुटा येथून झाले. माध्यमिकचे शिक्षण जी.के. खापरे विद्यालय थूगाव येथून पूर्ण केले. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांना शाळेपर्यंत पायी जावे लागत होते. पदवीपर्यंतचे शिक्षण जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजार येथून पूर्ण केले. सन २००५ मध्ये वडिलाचे निधन झाल्याने कौटुंबिक परिस्थितीतून सावरून त्यांनी सन २००७ मध्ये एलएलबीची पदवी प्राप्त केली. मागील आठ वर्षांपासून ते अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करीत असून आतापर्यंत त्यांनी चारवेळी जेएमएफसीच्या परीक्षा दिल्यात. त्यांना सन २०१५ च्या परीक्षेत यश प्राप्त झाले. उमेश सांगतो, स्वत:सोबत जर आपण प्रामाणिक राहिलो व अभ्यासात सातत्य ठेवल्यासच यश पदरी पडते. वकिलीमध्ये माझे सिनियर्स राजेंद्र तायडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. शिक्षण घेत असताना प्रकाश दाभाडे यांच्यासारखे गुरू लाभले व त्यांनी मला न्यायाधीश होण्याकरिता वेळोवेळी मार्गदर्शन केले. न्यायाधीश होणे हे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च स्वप्न असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्याचे आपले स्वप्न गुरुजनांच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाल्याचेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.