शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

आज अधिकारी कर्मचारी करणार गावात मुक्काम

By admin | Updated: December 9, 2014 22:42 IST

जिल्ह्यातील टंचाई नापिकी आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा ग्रामजिवनावर होत असलेला परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन करून उपाययोजना करण्यासाठी अधिकारी,

अमरावती : जिल्ह्यातील टंचाई नापिकी आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा ग्रामजिवनावर होत असलेला परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन करून उपाययोजना करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशांनुसार उद्या १० डिसेंबर रोजी अधिकारी-कर्मचारी गाव-खेड्यांमध्ये मुक्काम करतील.
यावर्षी बळीराजाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. त्यामध्ये कमी पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशा संकटामुळे जिल्ह्यातील १९८१ गावांवर संकट आले आहे. महसूल विभागाने हा प्रकार हेरला. एरवी ही प्रक्रिया शासकीयच. मात्र, यावेळी या प्रक्रियेत सकारात्मकता व संवादाची भर पडली. यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी, गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आणि त्यातून गाव मुक्कामाची संकल्पना पुढे आली.
त्यानुसार सर्व ८४३ ग्रामपंचायतींमध्ये वरिष्ठ शासकीय वर्ग १ व २ चे अधिकारी, महसूलमधील मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी व इतरही सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना गावात मुक्काम करावा लागणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी गित्ते व निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांनी दिले. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकारी करीत आहेत. अतिरिक्त मनुष्यबळाची देखील जुळवाजुळव सुरू आहे. गाव मुक्कामातून हाती येणाऱ्या माहितीतून पुढील कृती आराखडा तयार करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या सर्वांचे नियोजन व अंमलबजावणी निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार करीत आहेत. गावकऱ्यांचा अहवाल कागदोपत्री तयार करण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समस्या अधिक प्रखरपणे समोर येण्यास मदत होईल, असा उद्देश यातून साध्य होणार आहे. (प्रतिनिधी)