शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

कापूस आंदोलनाच्या थरारक आठवणी

By admin | Updated: November 21, 2015 00:14 IST

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून संपूर्ण विदर्भ पेटला असल्याने ...

४० वर्षे पूर्ण : दोन शेतकऱ्यांचा झाला होता मृत्यूधामणगाव रेल्वे : विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून संपूर्ण विदर्भ पेटला असल्याने कापसाच्या भाववाढीसाठी तालुक्यात झालेल्या ‘त्या’ थरारक आंदोलनाच्या आठवणी डोळ्यांसमोर दिसतात़ भाजप नेते अरूण अडसड यांच्या कानाजवळून गेलेली गोळी तसेच दुसऱ्या आंदोलनात तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा झालेला मृत्यूच्या आठवणी अंगावर शहारे आणतात़ शनिवार २१ नोव्हेंबरला या कापूस दिंडीच्या घटनेला ४० वर्षे पूर्ण होत आहेत.धामणगाव शहर पूर्वीच्या काळात कापसाची मोठी बाजारपेठ होती़ जिल्ह्यातील अनेक भागांतून धामणगाव शहरात त्या काळात कापूस विक्रीसाठी येत होता़ चार ते पाच दिवस कापसाचे मोजमाप तसेच विक्री होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना या शहरात तब्बल पाच ते सहा दिवस मुक्कामी रहावे लागत असे. त्याकाळी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात कपाशीव्यतिरिक्त दुसरे उत्पादन घेतले जात नव्हते़ ४० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून भाजप नेते अरूण अडसड यांनी कापूस दिंडी काढली होती़ नागपूरपर्यंत ३६२ किलो मीटर अंतरात पदयात्रा काढून तत्कालीन मुख्यमंत्री भोसले यांच्याकडून कापसाला भाव मिळवून घेतला होाता़ या दिंडीत भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे सहभागी झाले होते़ त्यानंतर शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष मोतीराम लहाने यांच्या नेतृत्वात कापसाच्या भाव वाढीसाठी हगि येथे कापूस सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले होते़ या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता़ अरूण अडसड यांच्या कानाजवळून गोळी गेली होती़ तिसरे आंदोलन कापूस भाव वाढीसाठी धामणगाव तालुक्यातील भातकुली रेणुकापूर येथे झाले होते़ त्यावेळी दोन शेतकऱ्यांचा बळी गेला होता. गणेश शिंदे व हिरपूर येथील सुनील जावळकर या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर रवी बिरे नामक शेतकरी गोळीबारात गंभीर जखमी झाला होता़ कापूस भाववाढीसाठी झालेल्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आठवणी सांगतात. आजही अनेक वयोवृध्द शेतकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत़ ४० वर्षांपूर्वी याच दिवशी धामणगाव शहरात कापूस भाववाढीकरिता अरूण अडसड, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांनी कापूस दिंडी काढली होती़