शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 13:33 IST

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणार्थ सरकारकडून २,६२३ उपाययोजनांची मात्रा

अमरावती : उन्हाळ्याच्या झळा लागताच जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भातील १,२९१ गावांमध्ये एप्रिलपश्चात पाणी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर पडली आहे. सध्या ३७.८५ कोटी रुपयांच्या २,६२३ उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजली आहे. यामध्ये नळ योजनांसह टँकरची कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले आहे. काही भागात याचे सुखद परिणाम दिसत आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील १४३ गावांमध्ये २६५ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ३३ टँकर, १६५ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १४९ नवीन विंधन विहीर व १८ तात्पुरत्या नळयोजना तयार करण्यात येणार आहे. यावर १२.६० कोटींचा निधी खर्च होईल. अकोला जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये १४० खासगी विहिरींचे अधिग्रहण, सहा नळयोजनांची दुरुस्ती, ३६ विंधन विहिरी व तात्पुरत्या पूरक पाच नळयोजना तयार करण्यात येणार आहे. या १८८ उपाययोजनांवर १.९४ कोटींंचा निधी खर्च होणार आहे.

या आहेत उपाययोजना

पाणीटंचाईसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३९९ गावांमध्ये चार विहिरी खोल करणे. ३४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा व ९२ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. अशा ४९८ उपाययोजनांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यात टंचाईग्रस्त २९६ गावांमध्ये २७८ खासगी विहिरींचे अधिग्रहण, २९ टँकर अशा एकूण ३०७ उपाययोजनांवर २.१६५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील २७४ गावांत २०१ विहिरींचे अधिग्रहण, १३ टँकर अशा एकूण २४५ उपाययोजनांवर १.५६ कोटींचा खर्च होईल.

जलप्रकल्पात ५० टक्क्यांवर उपयुक्त साठा

सद्यस्थितीत प्रमुख प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५४.९७ टक्के, यवतमाळातील पूसमध्ये ४२.४० टक्के, अरुणावती ३८.०८, बेंबळा ५७.३०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४४.२७ टक्के, वान ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ४०.०८ टक्के, पेनटाकळी ५४.०६ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात २३.१९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय मध्यम प्रकल्पातही ५० ते ६० टक्क्यांदरम्यान जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातGovernmentसरकारVidarbhaविदर्भ