शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 13:33 IST

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणार्थ सरकारकडून २,६२३ उपाययोजनांची मात्रा

अमरावती : उन्हाळ्याच्या झळा लागताच जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भातील १,२९१ गावांमध्ये एप्रिलपश्चात पाणी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर पडली आहे. सध्या ३७.८५ कोटी रुपयांच्या २,६२३ उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजली आहे. यामध्ये नळ योजनांसह टँकरची कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले आहे. काही भागात याचे सुखद परिणाम दिसत आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील १४३ गावांमध्ये २६५ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ३३ टँकर, १६५ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १४९ नवीन विंधन विहीर व १८ तात्पुरत्या नळयोजना तयार करण्यात येणार आहे. यावर १२.६० कोटींचा निधी खर्च होईल. अकोला जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये १४० खासगी विहिरींचे अधिग्रहण, सहा नळयोजनांची दुरुस्ती, ३६ विंधन विहिरी व तात्पुरत्या पूरक पाच नळयोजना तयार करण्यात येणार आहे. या १८८ उपाययोजनांवर १.९४ कोटींंचा निधी खर्च होणार आहे.

या आहेत उपाययोजना

पाणीटंचाईसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३९९ गावांमध्ये चार विहिरी खोल करणे. ३४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा व ९२ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. अशा ४९८ उपाययोजनांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यात टंचाईग्रस्त २९६ गावांमध्ये २७८ खासगी विहिरींचे अधिग्रहण, २९ टँकर अशा एकूण ३०७ उपाययोजनांवर २.१६५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील २७४ गावांत २०१ विहिरींचे अधिग्रहण, १३ टँकर अशा एकूण २४५ उपाययोजनांवर १.५६ कोटींचा खर्च होईल.

जलप्रकल्पात ५० टक्क्यांवर उपयुक्त साठा

सद्यस्थितीत प्रमुख प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५४.९७ टक्के, यवतमाळातील पूसमध्ये ४२.४० टक्के, अरुणावती ३८.०८, बेंबळा ५७.३०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४४.२७ टक्के, वान ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ४०.०८ टक्के, पेनटाकळी ५४.०६ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात २३.१९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय मध्यम प्रकल्पातही ५० ते ६० टक्क्यांदरम्यान जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातGovernmentसरकारVidarbhaविदर्भ