शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 13:33 IST

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणार्थ सरकारकडून २,६२३ उपाययोजनांची मात्रा

अमरावती : उन्हाळ्याच्या झळा लागताच जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भातील १,२९१ गावांमध्ये एप्रिलपश्चात पाणी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर पडली आहे. सध्या ३७.८५ कोटी रुपयांच्या २,६२३ उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजली आहे. यामध्ये नळ योजनांसह टँकरची कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले आहे. काही भागात याचे सुखद परिणाम दिसत आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील १४३ गावांमध्ये २६५ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ३३ टँकर, १६५ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १४९ नवीन विंधन विहीर व १८ तात्पुरत्या नळयोजना तयार करण्यात येणार आहे. यावर १२.६० कोटींचा निधी खर्च होईल. अकोला जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये १४० खासगी विहिरींचे अधिग्रहण, सहा नळयोजनांची दुरुस्ती, ३६ विंधन विहिरी व तात्पुरत्या पूरक पाच नळयोजना तयार करण्यात येणार आहे. या १८८ उपाययोजनांवर १.९४ कोटींंचा निधी खर्च होणार आहे.

या आहेत उपाययोजना

पाणीटंचाईसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३९९ गावांमध्ये चार विहिरी खोल करणे. ३४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा व ९२ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. अशा ४९८ उपाययोजनांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यात टंचाईग्रस्त २९६ गावांमध्ये २७८ खासगी विहिरींचे अधिग्रहण, २९ टँकर अशा एकूण ३०७ उपाययोजनांवर २.१६५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील २७४ गावांत २०१ विहिरींचे अधिग्रहण, १३ टँकर अशा एकूण २४५ उपाययोजनांवर १.५६ कोटींचा खर्च होईल.

जलप्रकल्पात ५० टक्क्यांवर उपयुक्त साठा

सद्यस्थितीत प्रमुख प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५४.९७ टक्के, यवतमाळातील पूसमध्ये ४२.४० टक्के, अरुणावती ३८.०८, बेंबळा ५७.३०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४४.२७ टक्के, वान ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ४०.०८ टक्के, पेनटाकळी ५४.०६ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात २३.१९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय मध्यम प्रकल्पातही ५० ते ६० टक्क्यांदरम्यान जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातGovernmentसरकारVidarbhaविदर्भ