शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

By गणेश वासनिक | Updated: May 11, 2025 15:23 IST

वन विभागातील बोगस कर्मचारी संघटनांच्या मानसिक छळाने त्रस्त, विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

-गणेश वासनिक, अमरावती अमरावती : वनविभागाच्या मेळघाट मध्य विभागात कार्यरत एका महिला ‘आरएफओ’चा छळ केल्याप्रकरणी वनरक्षकास निलंबित करण्यात आले असून, याप्रकरणी विशाखा समितीकडून चौकशी आरंभली आहे. मात्र, काही बोगस संघटनांकडून महिला अधिकाऱ्यांची विनाकारण तक्रारी देत ‘टार्गेट’ केले जात आहे. तर सोशल मीडियावर महिला अधिकाऱ्यांबाबत दर्जाहीन कमेंट्स होत असल्यामुळे आता या अन्यायग्रस्त ‘आरएफओ’नी राज्य महिला आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्याच्या वनविभागात शासन मान्यताप्राप्त नसलेल्या अनेक कर्मचारी संघटनांचा सुळसुळाट झाला आहे. बोगस संघटनांचे नेते, पदाधिकारी कर्तव्य न बजावता संघटनांचे ‘बॅनर’ वापरून स्थानिक पातळीवर वनाधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. मेळघाटात एका महिला ‘आरएफओ’ने वनरक्षकावर लिंगभेद आणि लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केल्यानंतर या संघटनेने निलंबित वनरक्षकाच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. वरिष्ठांना निवेदन देत या महिला ‘आरएफओं’वर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावले आहे. 

महिला ‘आरएफओं’नी तक्रार मागे घ्यावी, यासाठी मानसिक छळ केला जात आहे. त्यामुळे या अन्यायग्रस्त ‘आरएफओं’नी राज्य महिला आयाेगाकडे धाव घेतली असून, बोगस संघटनांनी दिलेल्या खोट्या तक्रारीच्या प्रत आणि साेशल मीडियावर होणारा मानसिक छळ आदी बाबी नमूद करून तक्रार पाठविली आहे. वनविभागात निम्म्या महिला अधिकारी, कर्मचारी असताना ‘त्या’ असुरक्षित असतील तर भविष्यात अनेक दीपाली चव्हाण बनण्यास वेळ लागणार नाही, असाच काहीसा कारभार वनविभागाचा सुरू आहे.

विशाखा समिती आज महिला आरएफओंचे बयाण नोंदविणार

महिला ‘आरएफओ’च्या लैंगिक छळप्रकरणी सुसर्दा परिक्षेत्रात कार्यरत निलंबित वनरक्षकाच्या कारनाम्यासंदर्भात विशाखा समितीने चौकशी आरंभली आहे. या समितीत एकूण पाच सदस्य असून, उपवनसंरक्षक दिव्या भारती या अध्यक्ष असल्याची माहिती आहे. अन्यायग्रस्त महिला ‘आरएफओं’चे सोमवार, १२ मे रोजी बयाण नोंदविले जाणार आहे.

नागपूर वन भवनात ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

अमरावतीत गत वर्षभरापूर्वी एका उपवनसंरक्षकांवर महिला आरएफओंनी गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. चौकशीअंती ‘त्या’ डीएसएफ’ची नागपूर येथे वन भवनात उचलबांगडी झाली. तथापि, हे अधिकारी आयएफएस दर्जाचे असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न लॉबीकडून होत आहे. 

तसेच या ‘डीसीएफ’ला काही महत्त्वपूर्ण पदाचे अतिरिक्त कार्यभार देण्यात आले. मात्र, तक्रारकर्त्या महिला ‘आरएफओ’ला इतर प्रकरणांत गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरे तर कोणत्याही तक्रारीची ९० दिवसांत चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, वर्ष पूर्ण झाले असतानाही अद्यापही या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही. अंतिम निर्णय समिती केव्हा देणार? या महिला आरएफओंना न्याय मिळणार की नाही? हे प्रश्न कायम आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळRupali Chakankarरुपाली चाकणकरstate women commissionमहाराष्ट्र राज्य महिला आयोगforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी