शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

By गणेश वासनिक | Updated: May 11, 2025 15:23 IST

वन विभागातील बोगस कर्मचारी संघटनांच्या मानसिक छळाने त्रस्त, विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

-गणेश वासनिक, अमरावती अमरावती : वनविभागाच्या मेळघाट मध्य विभागात कार्यरत एका महिला ‘आरएफओ’चा छळ केल्याप्रकरणी वनरक्षकास निलंबित करण्यात आले असून, याप्रकरणी विशाखा समितीकडून चौकशी आरंभली आहे. मात्र, काही बोगस संघटनांकडून महिला अधिकाऱ्यांची विनाकारण तक्रारी देत ‘टार्गेट’ केले जात आहे. तर सोशल मीडियावर महिला अधिकाऱ्यांबाबत दर्जाहीन कमेंट्स होत असल्यामुळे आता या अन्यायग्रस्त ‘आरएफओ’नी राज्य महिला आयोगाकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्याच्या वनविभागात शासन मान्यताप्राप्त नसलेल्या अनेक कर्मचारी संघटनांचा सुळसुळाट झाला आहे. बोगस संघटनांचे नेते, पदाधिकारी कर्तव्य न बजावता संघटनांचे ‘बॅनर’ वापरून स्थानिक पातळीवर वनाधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. मेळघाटात एका महिला ‘आरएफओ’ने वनरक्षकावर लिंगभेद आणि लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केल्यानंतर या संघटनेने निलंबित वनरक्षकाच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. वरिष्ठांना निवेदन देत या महिला ‘आरएफओं’वर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावले आहे. 

महिला ‘आरएफओं’नी तक्रार मागे घ्यावी, यासाठी मानसिक छळ केला जात आहे. त्यामुळे या अन्यायग्रस्त ‘आरएफओं’नी राज्य महिला आयाेगाकडे धाव घेतली असून, बोगस संघटनांनी दिलेल्या खोट्या तक्रारीच्या प्रत आणि साेशल मीडियावर होणारा मानसिक छळ आदी बाबी नमूद करून तक्रार पाठविली आहे. वनविभागात निम्म्या महिला अधिकारी, कर्मचारी असताना ‘त्या’ असुरक्षित असतील तर भविष्यात अनेक दीपाली चव्हाण बनण्यास वेळ लागणार नाही, असाच काहीसा कारभार वनविभागाचा सुरू आहे.

विशाखा समिती आज महिला आरएफओंचे बयाण नोंदविणार

महिला ‘आरएफओ’च्या लैंगिक छळप्रकरणी सुसर्दा परिक्षेत्रात कार्यरत निलंबित वनरक्षकाच्या कारनाम्यासंदर्भात विशाखा समितीने चौकशी आरंभली आहे. या समितीत एकूण पाच सदस्य असून, उपवनसंरक्षक दिव्या भारती या अध्यक्ष असल्याची माहिती आहे. अन्यायग्रस्त महिला ‘आरएफओं’चे सोमवार, १२ मे रोजी बयाण नोंदविले जाणार आहे.

नागपूर वन भवनात ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

अमरावतीत गत वर्षभरापूर्वी एका उपवनसंरक्षकांवर महिला आरएफओंनी गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. चौकशीअंती ‘त्या’ डीएसएफ’ची नागपूर येथे वन भवनात उचलबांगडी झाली. तथापि, हे अधिकारी आयएफएस दर्जाचे असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न लॉबीकडून होत आहे. 

तसेच या ‘डीसीएफ’ला काही महत्त्वपूर्ण पदाचे अतिरिक्त कार्यभार देण्यात आले. मात्र, तक्रारकर्त्या महिला ‘आरएफओ’ला इतर प्रकरणांत गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरे तर कोणत्याही तक्रारीची ९० दिवसांत चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, वर्ष पूर्ण झाले असतानाही अद्यापही या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही. अंतिम निर्णय समिती केव्हा देणार? या महिला आरएफओंना न्याय मिळणार की नाही? हे प्रश्न कायम आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळRupali Chakankarरुपाली चाकणकरstate women commissionमहाराष्ट्र राज्य महिला आयोगforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी