शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

-तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; 350 फुटांपर्यंतही थांग लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

हल्ली पावसाळा असल्याने पाण्याची टंचाई जाणवत नाही. मात्र, काही घरांमध्ये जीवन प्राधिकरणच्या परवानगीशिवाय बोअरवेल खोदण्यात आले आहे. विशेषत: नव्या नागरी वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदल्याशिवाय घर अथवा सदनिकांचे बांधकाम सुरू करण्यात येत नाही. बोअरवेल खोदण्याची अधिकृत परवानगी घेण्यात येत नाही. त्यामुळे मर्जीनुसार जमिनीत पाणी लागेपर्यंत बोअरवेल खोदल्या जाते. 

ठळक मुद्देशहराला दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिकेच्या लेखी बोअरवेलची संख्या ४,३००

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती, बडनेरा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्धारे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. दुसरीकडे अनधिकृत बोअरवेलची संख्या बेसुमार वाढत आहे. कोण, किती फूट बोअरवेल खोदते, याचे मापदंड नाहीत. येथील साईनगर, कॅम्प भागात ३५० फुटांपर्यंत बोअरवेलला पाणी लागत नसल्याची माहिती आहे. पाणी वापराचे नियोजन नसल्याने भविष्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल, यात दुमत नाही.हल्ली पावसाळा असल्याने पाण्याची टंचाई जाणवत नाही. मात्र, काही घरांमध्ये जीवन प्राधिकरणच्या परवानगीशिवाय बोअरवेल खोदण्यात आले आहे. विशेषत: नव्या नागरी वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदल्याशिवाय घर अथवा सदनिकांचे बांधकाम सुरू करण्यात येत नाही. बोअरवेल खोदण्याची अधिकृत परवानगी घेण्यात येत नाही. त्यामुळे मर्जीनुसार जमिनीत पाणी लागेपर्यंत बोअरवेल खोदल्या जाते. २०० फुटांच्यावर बोअरवेल खोदायचे असेल, तरच घरापर्यंत खोदणारी मशीन येते, असा शिरस्ता झाला आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृत बोअरवेलची शोधमाेहीम हाती घेतल्यास अनेक घरे, सदनिका, बंगल्यांमध्ये त्या खोदल्या असल्याचे वास्तव समाेर येईल. हल्ली राजरोस बोअरवेल खोदल्या जात असून, भविष्यात जमिनीत  पाणी मुरण्याकरिता सिमेंट काँक्रीटीकरणामुळे पाण्याची पातळी अधिक खोल जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती महानगराला २४ जलकुंभावरून पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे.  महापालिकेत नियमबाह्य बोअरवेल करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची अद्यापही नोंद नसल्याची माहिती आहे. 

जलपुनर्भरण नावालाचमहापालिकेत नव्या बांधकामाला परवानगी देतावेळी मंजूर नकाशात जलपुनर्भरण प्रणाली असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे १० हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्यात येते. मात्र, हे जलपुनर्भरण नावालाच ठरते. बांधकामानंतर अभियंता घटनास्थळी जाऊन जलपुनर्भरणबाबतची पाहणी करीत नाही.- किशोर शेळके, अमरावती.

अवेळी पाऊस येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जलपुनर्भरण व्यवस्था उभारणे ही काळाची गरज झाली आहे. सिमेंटच्या जंगलामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसून, ते वाहून जाते. जमिनीत पाणीसाठा कमी हाेत चालला आहे. याकरिता ठोस उपाययोजना व्हाव्यात.- रमेश जाधव, अमरावती.

कंवरनगर, दस्तुरनगरात सर्वाधिक बोअरवेल, पाणी सर्वांत कमी

कंवरनगर, दस्तुरनगर भागात मजीप्राच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही, अशी रहिवासी नागरिकांची ओरड आहे.

अंबागेट, बुधवारा, साबणपुरा, औरगंपुरा, जवाहरगेटच्या आतील भागात जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

कंवरनगर, दस्तुरनगर भागात अधिक संख्येने बोअरवेल आहे. त्यामुळे पाणी कमी मिळते. जलकुंभापासून हा भाग लांब असल्याने पाणी मिळत नाही.

कोणीही या, बोअरवेल खोदा- शहरातील नव्या कॉलनी, वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे बोअरवेल खोदले जाते. साईनगर, कॅम्प भागात ३५० फुटांच्यावर बोअरवेल खोदले जात आहे.- राज्य शासनाने २५ मे २०१९ रोजी बोअरवेल खोदण्याबाबत नागरिकांकडून मते मागविली होती. मात्र, नियमबाह्य बोअरवेल खोदण्याचा प्रताप सुरूच आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याने पाणी कमी मिळते. नियमबाह्य बोअरवेल खोदून पाणी उपसण्याची शक्कल लढविली जात आहे. 

बडनेरा, महादेवखोरी, व्हीएमव्ही भागात जास्त पाणी- जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभ असलेल्या भागात जास्त पाणी मिळते. यात बडनेरा, महादेवखोरी, व्हीएमव्ही, साईनगर आदी भागात जास्त     पाणीपुरवठा होतो.- शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी वडाळी, नागपुरी, नवसारी, पॅराडाईज कॉलनी, मायानगर भागात पुरेसा पाणीपुरवठा होतो.

 

टॅग्स :Waterपाणी